शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात १८० रुपये!

By admin | Updated: May 18, 2017 01:49 IST

शेतकरी त्रस्त : विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँकेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : बोरगाव वैराळे, हातरुण, सोनाळा, शिंगोली परिसरातील शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक कर्ज घेण्यासाठी बाळापूर तालुक्यातील सेंट्रल बँक लोहारा, युको बँक निंबा, सेंट्रल बँक बाळापूर, भारतीय स्टेट बँक शाखा बाळापूर, भूविकास बँक अकोला, सेंट्रल बँक गांधीग्राम व विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक अंदुरा या सर्वच बँकेचे कर्ज नसल्याचे दाखले शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी गोळा करावे लागतात. यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक बँक शाखा वेगवेगळे दर आकारत असते. पैसे घेतल्यानंतरदेखील शेतकऱ्यांना दाखल्यासाठी दिवसभर ताटकळत बसवून ठेवले जात असल्याने शेतकरी वैतागले. विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा अंदुरा गतवर्षीपर्यंत २५ रुपयांत दाखला देत होती. या बँकेने कर्ज नसल्याचा दाखला देण्याचा दर १८० रुपयांवर नेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बोरगाव वैराळे, हातरुण, सोनाळा, शिंगोली परिसरातील शेतकऱ्यांना प्रत्येक गावातील सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकरी सभासद हे नव्याने पीक कर्ज घेत असतात. नव्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाळापूर तालुक्यातील पाच आणि अकोला शहरातील एक, अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथील एक अशा सात बँकांच्या कर्ज नसल्याच्या दाखल्याची जुळवाजुळव करावी लागते. या दाखल्यांसाठी वेगवेगळ्या बँका शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दर आकारतात. यापैकी सेंट्रल बँक लोहारा ५० रुपये, युको बँक निंबा ५० रुपये, सेंट्रल बँक बाळापूर ५० रुपये, भारतीय स्टेट बँक बाळापूर ३० रुपये, भूविकास बँक अकोला २० रुपये, सेंट्रल बॅक गांधीग्राम ५० रुपये, विदर्भ क्षेत्रीय कोकण ग्रामीण बँकेने गतवर्षीच्या २५ रुपयांच्या दरात वाढ करून एकदम १८० रुपये दर आकारणे सुरू केले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना कर्ज नसल्याचे दाखले देण्यासाठी प्रत्येक बँकेला कमीतकमी दर आकारण्याची सूचना केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल. बोरगाव वैराळे , हातरुण परिसरातील जे शेतकरी विविध बँकेच्या माध्यमातून कर्ज घेत नाहीत. त्यांना कर्ज नसल्याचा दाखला देण्यासाठी नाममात्र २५ रुपये दर आकारून कमीतकमी वेळात दाखला दिला पाहिजे. अवास्तव दर आकारूनदेखील बँकेकडून दुपारी ३ वाजताच्या नंतर दाखले दिले जात असल्याने सात बँकांचे दाखले मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आठवडाभर बँकेचे उबरंठे झिजवावे लागत आहेत. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे- मुरलीधर पाटील, शेतकरी, हातरुण.शेतकरी ज्या बँकेकडून कृषी कर्ज घेत असतील, त्या बँकेने कर्ज वाटपाबाबतीत जर अर्ज शेतकऱ्यांच्या सोबत दिला असेल, तर त्याला कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी शून्य पैसे आकारण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. मात्र शेतकरी कृषी कर्ज मागणीचा बँकेने दिलेला अर्ज सोबत आणत नाहीत. त्यामुळे बिगर शेती कर्ज घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी १८० रुपयांचे दर आकारण्याच्या नियमानुसार त्यांना १८० रुपयेप्रमाणे दर आकारण्यात आले.- आर.आर. मोहरीर, शाखा व्यवस्थापक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक,अंदुरा.शेतकऱ्यांना बँकेकडून कृषी कर्ज मागणीचा अर्ज देण्यात येत नाही आणि तो अर्ज सोबत नेल्यानंतर कर्ज नसल्याचा दाखला मिळविण्यासाठी पैसे लागत नाहीत, याबद्दल बँका शेतकऱ्यांना माहिती देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बाबीला केवळ बँकेतील अधिकारीच जबाबदार आहेत.- विजय पाटील, संचालक, सेवा सहकारी संस्था, हातरुण.