शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात १८० रुपये!

By admin | Updated: May 18, 2017 01:49 IST

शेतकरी त्रस्त : विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँकेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : बोरगाव वैराळे, हातरुण, सोनाळा, शिंगोली परिसरातील शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक कर्ज घेण्यासाठी बाळापूर तालुक्यातील सेंट्रल बँक लोहारा, युको बँक निंबा, सेंट्रल बँक बाळापूर, भारतीय स्टेट बँक शाखा बाळापूर, भूविकास बँक अकोला, सेंट्रल बँक गांधीग्राम व विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक अंदुरा या सर्वच बँकेचे कर्ज नसल्याचे दाखले शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी गोळा करावे लागतात. यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक बँक शाखा वेगवेगळे दर आकारत असते. पैसे घेतल्यानंतरदेखील शेतकऱ्यांना दाखल्यासाठी दिवसभर ताटकळत बसवून ठेवले जात असल्याने शेतकरी वैतागले. विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा अंदुरा गतवर्षीपर्यंत २५ रुपयांत दाखला देत होती. या बँकेने कर्ज नसल्याचा दाखला देण्याचा दर १८० रुपयांवर नेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बोरगाव वैराळे, हातरुण, सोनाळा, शिंगोली परिसरातील शेतकऱ्यांना प्रत्येक गावातील सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकरी सभासद हे नव्याने पीक कर्ज घेत असतात. नव्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाळापूर तालुक्यातील पाच आणि अकोला शहरातील एक, अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथील एक अशा सात बँकांच्या कर्ज नसल्याच्या दाखल्याची जुळवाजुळव करावी लागते. या दाखल्यांसाठी वेगवेगळ्या बँका शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दर आकारतात. यापैकी सेंट्रल बँक लोहारा ५० रुपये, युको बँक निंबा ५० रुपये, सेंट्रल बँक बाळापूर ५० रुपये, भारतीय स्टेट बँक बाळापूर ३० रुपये, भूविकास बँक अकोला २० रुपये, सेंट्रल बॅक गांधीग्राम ५० रुपये, विदर्भ क्षेत्रीय कोकण ग्रामीण बँकेने गतवर्षीच्या २५ रुपयांच्या दरात वाढ करून एकदम १८० रुपये दर आकारणे सुरू केले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना कर्ज नसल्याचे दाखले देण्यासाठी प्रत्येक बँकेला कमीतकमी दर आकारण्याची सूचना केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल. बोरगाव वैराळे , हातरुण परिसरातील जे शेतकरी विविध बँकेच्या माध्यमातून कर्ज घेत नाहीत. त्यांना कर्ज नसल्याचा दाखला देण्यासाठी नाममात्र २५ रुपये दर आकारून कमीतकमी वेळात दाखला दिला पाहिजे. अवास्तव दर आकारूनदेखील बँकेकडून दुपारी ३ वाजताच्या नंतर दाखले दिले जात असल्याने सात बँकांचे दाखले मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आठवडाभर बँकेचे उबरंठे झिजवावे लागत आहेत. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे- मुरलीधर पाटील, शेतकरी, हातरुण.शेतकरी ज्या बँकेकडून कृषी कर्ज घेत असतील, त्या बँकेने कर्ज वाटपाबाबतीत जर अर्ज शेतकऱ्यांच्या सोबत दिला असेल, तर त्याला कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी शून्य पैसे आकारण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली आहे. मात्र शेतकरी कृषी कर्ज मागणीचा बँकेने दिलेला अर्ज सोबत आणत नाहीत. त्यामुळे बिगर शेती कर्ज घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी १८० रुपयांचे दर आकारण्याच्या नियमानुसार त्यांना १८० रुपयेप्रमाणे दर आकारण्यात आले.- आर.आर. मोहरीर, शाखा व्यवस्थापक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक,अंदुरा.शेतकऱ्यांना बँकेकडून कृषी कर्ज मागणीचा अर्ज देण्यात येत नाही आणि तो अर्ज सोबत नेल्यानंतर कर्ज नसल्याचा दाखला मिळविण्यासाठी पैसे लागत नाहीत, याबद्दल बँका शेतकऱ्यांना माहिती देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बाबीला केवळ बँकेतील अधिकारीच जबाबदार आहेत.- विजय पाटील, संचालक, सेवा सहकारी संस्था, हातरुण.