शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

भाजीपाला थेट विक्रीतून शेतक-यांना मिळाला दुप्पट भाव!

By admin | Updated: January 20, 2017 02:44 IST

रणधीर सावरकर यांचा पुढाकार; ताजा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

अकोला, दि. १९- शहरातील जठारपेठमधील किरकोळ भाजीपाला विक्रेते आणि शेतकर्‍यांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी घेतलेला पुढाकार यशस्वी झाला. त्यामुळे गुरुवारी भाजीपाला थेट विक्रीतून भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना बाजार भावापेक्षा दुप्पट भाव मिळाला असून, ताजा आणि स्वस्त दरात मिळणारा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनीही गर्दी केली. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत महानगरपालिकेमार्फत शहरातील जनता भाजी बाजारमधील अतिक्रमित दुकाने पाडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ जनता भाजी बाजारातील व्यापारी आणि दलालांनी तीन दिवसांपूर्वी भाजी बाजार बंद ठेवला. या बंदमध्ये किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी सहभाग घेतला नाही म्हणून त्यांना भाजीपाला देणे बंद करण्यात आले. किरकोळ विक्रेत्यांनी दलालांच्या या निर्णयाविरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दलालांच्या या निर्णयामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जठारपेठ भाजी विक्रेता संघाच्या पदाधिकार्‍यांनी आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेतली. किरकोळ भाजी विक्रेत्यांच्या अडचणी आ. सावरकर यांनी समजून घेतल्या आणि शेतकर्‍यांचा शेतमाल थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याबाबतचे नियोजन केले. त्यानुसार गुरुवारी पुनोती येथील मनोहर मानकर आणि शंकर सराळे या दोन शेतकर्‍यांनी आणलेली भाजीपाल्याची गाडी थेट जठारपेठमधील भाजी बाजारात पोहोचविण्यात आली. तेथील भाजी विक्रेता संघाच्या पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांनी आणलेला भाजीपाला दलाल आणि व्यापार्‍यांपेक्षा दुप्पट दराने विकत घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचविला. थेट भाजीपाला विक्रीतून भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना दुप्पट भाव मिळाला. ग्राहकांनाही नेहमीपेक्षा माफक दरात ताजा भाजीपाला उपलब्ध झाला. त्यामुळे थेट आणि ताजा मिळणारा भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र होते.