शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

दीड लाखांवर शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:46 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार,  ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. 

ठळक मुद्देकर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघातशेतकर्‍यांना वेठीस धरणे बंद करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार,  ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र,  सामूहिक सेवा केंद्र (सीएससी ) आणि आपले सरकार केंद्र  इत्यादी सेतू केंद्रांवर थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन  अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची  मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीचे  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांचे सेतू केंद्रांवर गर्दी  होत आहे. दरम्यान, ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात  कर्जमाफीसाठी १ लाख ८३ हजार ३0९ शेतकर्‍यांच्या  अर्जांची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ५२ हजार  ५७६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. दरम्यान,  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक नसलेल्या  आणि बायोमेट्रिक मशीनवर अंगठा (थम) जुळत नसलेल्या  शेतकर्‍यांच्या आधार क्रमांक नोंदणीसाठी जिल्ह्यात २२  केंद्रांवर नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

कर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघातकर्जमाफी अर्जासोबत आधारचे विवरण जुळत नसल्याने  देगाव मानकी येथील शेतकरी महिला वाडेगाव येथे जाताना  झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. खासगी  रुग्णालयात तिच्यावर उपचारासाठी आता पैशाचीही  अडचण निर्माण झाली. त्यामुळे शासनाने छत्रपती शिवाजी  महाराज शेतकरी सन्मान योजना नावाने सुरू केलेली  कर्जमाफी योजना प्रत्यक्षात शेतकर्‍यांचा अवमान करणारी  ठरत असून, त्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे प्रकार  बंद करा, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष गौ तम सिरसाट, ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी निवेदनात केली आहे. मानकी येथील महिला सुधाबाई कैलास सिरसाट ही महिला  कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी बाळापूर येथे गेली.  तेथे आधार कार्डातील माहितीचे विवरण जुळत नव्हते.  त्यामुळे महिलेला वाडेगाव येथील आधार अद्ययावतीकरण  केंद्रात जाण्याचा सल्ला केंद्र संचालकाने दिला. त्यानुसार वाडेगावकडे जाताना खड्डय़ात वाहन उसळल्याने  अपघात झाला. त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. उ पचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल  करावे लागले. आता उपचारासाठी प्रचंड खर्च होत आहे. या  प्रकारातून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. ते त्वरित बंद  करावे, अशी मागणीही सिरसाट, सुलताने यांनी केली आहे.