शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

दीड लाखांवर शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:46 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार,  ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. 

ठळक मुद्देकर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघातशेतकर्‍यांना वेठीस धरणे बंद करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार,  ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र,  सामूहिक सेवा केंद्र (सीएससी ) आणि आपले सरकार केंद्र  इत्यादी सेतू केंद्रांवर थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन  अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची  मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीचे  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांचे सेतू केंद्रांवर गर्दी  होत आहे. दरम्यान, ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात  कर्जमाफीसाठी १ लाख ८३ हजार ३0९ शेतकर्‍यांच्या  अर्जांची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ५२ हजार  ५७६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. दरम्यान,  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक नसलेल्या  आणि बायोमेट्रिक मशीनवर अंगठा (थम) जुळत नसलेल्या  शेतकर्‍यांच्या आधार क्रमांक नोंदणीसाठी जिल्ह्यात २२  केंद्रांवर नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

कर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघातकर्जमाफी अर्जासोबत आधारचे विवरण जुळत नसल्याने  देगाव मानकी येथील शेतकरी महिला वाडेगाव येथे जाताना  झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. खासगी  रुग्णालयात तिच्यावर उपचारासाठी आता पैशाचीही  अडचण निर्माण झाली. त्यामुळे शासनाने छत्रपती शिवाजी  महाराज शेतकरी सन्मान योजना नावाने सुरू केलेली  कर्जमाफी योजना प्रत्यक्षात शेतकर्‍यांचा अवमान करणारी  ठरत असून, त्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे प्रकार  बंद करा, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष गौ तम सिरसाट, ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी निवेदनात केली आहे. मानकी येथील महिला सुधाबाई कैलास सिरसाट ही महिला  कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी बाळापूर येथे गेली.  तेथे आधार कार्डातील माहितीचे विवरण जुळत नव्हते.  त्यामुळे महिलेला वाडेगाव येथील आधार अद्ययावतीकरण  केंद्रात जाण्याचा सल्ला केंद्र संचालकाने दिला. त्यानुसार वाडेगावकडे जाताना खड्डय़ात वाहन उसळल्याने  अपघात झाला. त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. उ पचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल  करावे लागले. आता उपचारासाठी प्रचंड खर्च होत आहे. या  प्रकारातून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. ते त्वरित बंद  करावे, अशी मागणीही सिरसाट, सुलताने यांनी केली आहे.