शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांवर शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:46 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार,  ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. 

ठळक मुद्देकर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघातशेतकर्‍यांना वेठीस धरणे बंद करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार,  ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र,  सामूहिक सेवा केंद्र (सीएससी ) आणि आपले सरकार केंद्र  इत्यादी सेतू केंद्रांवर थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन  अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची  मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीचे  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांचे सेतू केंद्रांवर गर्दी  होत आहे. दरम्यान, ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात  कर्जमाफीसाठी १ लाख ८३ हजार ३0९ शेतकर्‍यांच्या  अर्जांची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ५२ हजार  ५७६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. दरम्यान,  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक नसलेल्या  आणि बायोमेट्रिक मशीनवर अंगठा (थम) जुळत नसलेल्या  शेतकर्‍यांच्या आधार क्रमांक नोंदणीसाठी जिल्ह्यात २२  केंद्रांवर नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

कर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघातकर्जमाफी अर्जासोबत आधारचे विवरण जुळत नसल्याने  देगाव मानकी येथील शेतकरी महिला वाडेगाव येथे जाताना  झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. खासगी  रुग्णालयात तिच्यावर उपचारासाठी आता पैशाचीही  अडचण निर्माण झाली. त्यामुळे शासनाने छत्रपती शिवाजी  महाराज शेतकरी सन्मान योजना नावाने सुरू केलेली  कर्जमाफी योजना प्रत्यक्षात शेतकर्‍यांचा अवमान करणारी  ठरत असून, त्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे प्रकार  बंद करा, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष गौ तम सिरसाट, ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी निवेदनात केली आहे. मानकी येथील महिला सुधाबाई कैलास सिरसाट ही महिला  कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी बाळापूर येथे गेली.  तेथे आधार कार्डातील माहितीचे विवरण जुळत नव्हते.  त्यामुळे महिलेला वाडेगाव येथील आधार अद्ययावतीकरण  केंद्रात जाण्याचा सल्ला केंद्र संचालकाने दिला. त्यानुसार वाडेगावकडे जाताना खड्डय़ात वाहन उसळल्याने  अपघात झाला. त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. उ पचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल  करावे लागले. आता उपचारासाठी प्रचंड खर्च होत आहे. या  प्रकारातून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. ते त्वरित बंद  करावे, अशी मागणीही सिरसाट, सुलताने यांनी केली आहे.