शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

शेती उपयोगी साधनांच्या भाववाढीने शेतकरी बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

हातरूण: निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे शेती बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. तसेच दरवर्षी शेती ...

हातरूण: निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे शेती बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. तसेच दरवर्षी शेती उपयोगी साधनांच्या किमतीत होणारी भरमसाट वाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहेत. यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

बाळापूर तालुक्यात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू आदी पीक घेतले जातात; मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची समानता असल्याने पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची प्रचंड कमतरता निर्माण होते. अशा वेळी पिके काढणीसाठी मागेल ती मजुरी देऊन बाहेरगावाहून मजूर आणावे लागतात. परिणामी, शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. दरवर्षी शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमती वाढत आहे. यंदा १ मार्चपासून खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या दरात प्रति ५० किलोच्या बॅग मागे १७.३४ टक्के वाढ केली आहे. ही वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. डिझेलच्या किमती वाढत असल्याने ट्रॅक्टरद्वारा पीक काढणी, मळणीसह शेत मशागतीच्या खर्चात वाढ होत आहे. विजेची दरवाढ डोईजड होत आहे. दरवर्षी शेतपिकांच्या उत्पादन खर्चात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत आहे. मात्र उत्पादन खर्चानुसार शेतमालाला हमी भाव मिळत नाही. संपूर्ण शेतमालाची शासकीय हमीभावात सीसीआय किंवा नाफेड यंत्रणेकडून खरेदी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागतो. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहे. म्हणून शेती व्यवसायातील अडचणी लक्षात घेऊन शासनाने शेतकरी हिताचे रक्षण करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

--------------------

शेतमालाला भाव कमी मिळत आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरविल्याने भरमसाट मजुरी वाढली आहे. अशातच शेती उपयोगी साहित्यांची किंमतही भरमसाट झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- मंजूर शाह, शेतकरी, हातरुण.

शेती व्यवसायातील अडचणी लक्षात घेऊन शासनाने शेतकरी हिताचे रक्षण करावे, पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडर गॅस चे भाव वाढले आहेत. खताच्या किमती वाढल्या. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने गोरगरीब नागरिकांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- राम गव्हाणकर, सदस्य, जिल्हा परिषद, अकोला