शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीने माखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:11 IST

- रवी दामोदर अकोला : अकोला -नीमकर्दा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. एकीकडे विकासकाम सुरू आहे; मात्र दुसरीकडे ...

ठळक मुद्देअकोला-निमकर्दा रस्त्यावरील प्रकार१०० ते १५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

- रवी दामोदर

अकोला: अकोला-नीमकर्दा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. एकीकडे विकासकाम सुरू आहे; मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे स्वप्न हे धुळीने माखले आहे. या मार्गाने जाणा-या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. धुळीमुळे रस्त्यालगत असलेल्या शेतक-यांच्या उभ्या पिकावर धूळ बसून तूर पिकांचे नुकसान होत आहे. अकोला ते निमकर्दादरम्यान जवळपास १०० ते १५० हेक्टरवरील पीक धोक्यात सापडले आहे.

 

यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. यावर्षी शेती व्यवसाय हा पूर्ण तोट्यात आला असून, त्यामध्ये भरीस भर म्हणून धुळीमुळे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अकोला-निमकर्दा मार्ग अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गाचे काम सुरू असून, मुरूम टाकण्यात आला आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून कडेला असलेल्या शेतातील पिकांवर जाऊन बसते. यामुळे पिकांचे नुकसान होत असून, शेतकरी संकटात सापडला आहे. धुळीमुळे पिकांचे होणारे नुकसान थांबविण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

 

पाणी मारूनही उपयोग नाही!

शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रस्त्यावर पाणी मारण्यात येत आहे; मात्र उन्हाचा पारा वाढल्याने अवघ्या काही मिनिटातच रस्त्यावरील पाणी सुकून जात असल्याने पुन्हा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे पाणी मारून काहीही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे.

 

रात्री अपघाताची शक्यता वाढली!

रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवसा थोडेफार दिसत असले, तरी रात्री य मार्गाने वाहन चालविणे कठीण झाले आहे.

 

रस्त्याच्या दुळीमुळे माझ्या शेतातील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांवर धूळ साचल्यामुळे उत्पादनात निम्मे घट झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन मदत करावी.

- गजानन पकदाने, शेतकरी, गायगाव.

 

रस्त्यावरील धूळ, माती पिकांवर बसल्याने नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या नाहीत; मात्र धुळीमुळे पिकांच्या गुणवत्तेवर काही प्रमाणात परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: कपाशीच्या पिकावर परिणाम दिसून येऊ शकतो.

- प्रा. ए.एन. पटलावार, कृषी विद्या विभाग,डॉ. पीडीकेव्ही, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती