शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीने माखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:11 IST

- रवी दामोदर अकोला : अकोला -नीमकर्दा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. एकीकडे विकासकाम सुरू आहे; मात्र दुसरीकडे ...

ठळक मुद्देअकोला-निमकर्दा रस्त्यावरील प्रकार१०० ते १५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

- रवी दामोदर

अकोला: अकोला-नीमकर्दा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. एकीकडे विकासकाम सुरू आहे; मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे स्वप्न हे धुळीने माखले आहे. या मार्गाने जाणा-या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. धुळीमुळे रस्त्यालगत असलेल्या शेतक-यांच्या उभ्या पिकावर धूळ बसून तूर पिकांचे नुकसान होत आहे. अकोला ते निमकर्दादरम्यान जवळपास १०० ते १५० हेक्टरवरील पीक धोक्यात सापडले आहे.

 

यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. यावर्षी शेती व्यवसाय हा पूर्ण तोट्यात आला असून, त्यामध्ये भरीस भर म्हणून धुळीमुळे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अकोला-निमकर्दा मार्ग अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गाचे काम सुरू असून, मुरूम टाकण्यात आला आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून कडेला असलेल्या शेतातील पिकांवर जाऊन बसते. यामुळे पिकांचे नुकसान होत असून, शेतकरी संकटात सापडला आहे. धुळीमुळे पिकांचे होणारे नुकसान थांबविण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

 

पाणी मारूनही उपयोग नाही!

शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रस्त्यावर पाणी मारण्यात येत आहे; मात्र उन्हाचा पारा वाढल्याने अवघ्या काही मिनिटातच रस्त्यावरील पाणी सुकून जात असल्याने पुन्हा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे पाणी मारून काहीही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे.

 

रात्री अपघाताची शक्यता वाढली!

रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवसा थोडेफार दिसत असले, तरी रात्री य मार्गाने वाहन चालविणे कठीण झाले आहे.

 

रस्त्याच्या दुळीमुळे माझ्या शेतातील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांवर धूळ साचल्यामुळे उत्पादनात निम्मे घट झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन मदत करावी.

- गजानन पकदाने, शेतकरी, गायगाव.

 

रस्त्यावरील धूळ, माती पिकांवर बसल्याने नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या नाहीत; मात्र धुळीमुळे पिकांच्या गुणवत्तेवर काही प्रमाणात परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: कपाशीच्या पिकावर परिणाम दिसून येऊ शकतो.

- प्रा. ए.एन. पटलावार, कृषी विद्या विभाग,डॉ. पीडीकेव्ही, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती