शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

शेतक-यांनाच शेती कळली नाही, पंधरा मिनिटात पथकाला कशी कळणार?

By admin | Updated: December 18, 2014 01:01 IST

लोकमत परिचर्चेत शेतक-यांचा उपरोधिक सवाल; सर्वेक्षणाला ठरविले फार्स.

अकोला : शेती काय असते, शेतीचे प्रश्न कोणते, उत्पादनात होणारा र्‍हास, शेतीसंबंधीच्या शेकडो प्रश्नांची उकल दस्तूरखुद शेतकर्‍यांनाच झालेली नसताना केवळ पंधरा मिनिटात नापीक शेतीचा सर्व्हे करणार्‍या केंद्रीय पथकाला झालेले नुकसान आणि शेतकर्‍यांच्या व्यथा कशा कळणार कशी, असा उ परोधिक सवाल लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेत शेतकर्‍यांनी उपस्थित केला. यावर्षी राज्यात अवर्षणस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलग दोन वर्ष शेतात उत्पादन झाले नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी बिघडली आहे. हातात पैसा नसल्याने त्यांची क्रयशक्ती संपली, अशा अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करताना थकलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे. याच सर्व परिस्थि तीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हय़ात येऊन गेले, पण या पथकाने केवळ सतरा मिनिटात आणि तेही रात्रीच्या वेळी शेतीची पाहणी करू न शेतकर्‍यांची बोळवण केली आहे. आम्हाला देता काय, यापेक्षा आमचे म्हणणे काय आहे, हे ऐकून घेण्याची फुरसत या पथकाला नव्हती; म्हणजेच या पथकाने शेतकर्‍यांची थट्टा केली असल्याचा सूर शेतकर्‍यांमध्ये उमटला. परिचर्चेत अकोला जिल्ह्यातील प्रग तीशिल शेतकरी दादाराव देशमुख, जयप्रकाश मुरमकार, हेमंत देशमुख, कुवरसिंग मोहने, प्रशांत बंड आदी शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.