शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेतकरी संकटात; विनाअट हवी मदत - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:50 IST

शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

- संतोष येलकर

अकोला: सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात २० लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी व भात पिकाचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.पावसाळा संपल्यानंतर गत २० आॅक्टोबरपासून परतीचा पाऊस सतत बरसत आहे. सतत बरसणाºया परतीच्या पावसाने, कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांसह कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे भिजलेले सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत अशा एकूण २५ जिल्ह्यांत २० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत दिली पाहिजे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.पीक नुकसानाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकºयांची धावपळ!पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी पीक नुकसानाची माहिती संबंधित पीक विमा कंपनीकडे देणे आवश्यक आहे; मात्र तालुकास्तरावर विमा कंपनीचे अधिकारीच उपलब्ध नाहीत, त्यामुळे पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये सादर करण्यासाठी शेतकºयांना धावपळ करावी लागत आहे. पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारी