शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

शेतकरी संकटात; विनाअट हवी मदत - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:50 IST

शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

- संतोष येलकर

अकोला: सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात २० लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी व भात पिकाचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.पावसाळा संपल्यानंतर गत २० आॅक्टोबरपासून परतीचा पाऊस सतत बरसत आहे. सतत बरसणाºया परतीच्या पावसाने, कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांसह कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे भिजलेले सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत अशा एकूण २५ जिल्ह्यांत २० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत दिली पाहिजे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.पीक नुकसानाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकºयांची धावपळ!पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी पीक नुकसानाची माहिती संबंधित पीक विमा कंपनीकडे देणे आवश्यक आहे; मात्र तालुकास्तरावर विमा कंपनीचे अधिकारीच उपलब्ध नाहीत, त्यामुळे पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये सादर करण्यासाठी शेतकºयांना धावपळ करावी लागत आहे. पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारी