शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यातील शेतकरी कंपन्यांची दोनशे कोटींची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:14 IST

अकोला : बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या राज्यात दोन हजारांवर कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, यातील १८४ कंपन्यांनी आजमितीस २०४ कोटींची उलाढाल केली आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या राज्यात दोन हजारांवर कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, यातील १८४ कंपन्यांनी आजमितीस २०४ कोटींची उलाढाल केली आहे. काही कंपन्यांनी शेतमालाची थेट परदेशात निर्यात सुरू केली आहे. यात विदर्भातील अकोला जिल्ह्यातील शेतकरी कंपनीचा समावेश आहे; पण शेतकरी गटांना प्रोत्साहन देणारा प्रकल्पच बंद करण्यात आला आहे.शेतकऱ्यांनी बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाद्वारे करण्यात आले होते. शेतकरी गटाच्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पणन मंडळ, आत्मा व खासगी कंपन्यांनी काम केले. शेतकरी कंपन्यांना प्रोत्साहन व भांडवलाची गरज पूर्ण व्हावी, याकरिता राज्याच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला; पण ज्या उद्देशासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला होता, तो प्रकल्पच बंद पडला आहे. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली होती. आता दोन महिन्यांपासून प्रकल्प ठप्प आहे. याच प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपन्यांनी २०४ कोटींची उलाढाल केली आहे. असे असले तरी बºयाच कंपन्या मागे पडल्या आहेत. जागतिक बँकेच्या प्रकल्पासह शासनाने शेतकरी कंपन्यांना कृषी विभागातून योजना दिल्या. आता शेतकरी कंपन्यांच्या भागधारकांनी शेतकरी विकासाच्या दृष्टीने पुढे येणे गरजेचे आहे. शासनानेही कायमस्वरू पी एक अधिकारी तालुका, जिल्हा स्तरावर देण्याची गरज आहे. पणन मंडळाने जेवढ्या संचालकांना निर्यातीचे विनामूल्य प्रशिक्षण दिले. त्यांनीदेखील निर्यातीचे काम सुरू करण्याची गरज आहे.- अकोल्याच्या ‘नरनाळा’ची निर्यात!राज्यात नाशिक येथील अ‍ॅग्रो शेतकरी कंपनी आशिया खंडातील पहिल्या पाचमध्ये द्राक्ष निर्यात करणारी कंपनी असून, महाएफपीसी कंपनी कांदा विक्रीत अग्रेसर आहे. ही कंपनी केरळ, चेन्नई येथे कांदा पाठवित आहे. अकोला-अकोट येथील नरनाळा कंपनीने केळी व डाळिंब निर्यातीत पाऊल टाकले आहे. दरम्यान, खासगी, सार्वजनिक भागेदारीचा २५ कोटींचा प्रकल्प यासाठी मंजूर करण्यात आला आहे. कंपन्यांनी आता अनुदानावर अवलंबून न राहता खासगी कंपन्यांप्रमाणे काम करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- राज्यात दोन हजारांवर शेतकरी कंपन्यांचे जाळे विणण्यात आले असून, १८४ कंपन्यांची २०० कोटींच्यावर उलाढाल सुरू आहे. निर्यातही सुरू आहे. आता भागधारकांनी ताकदीनिशी पुढे येणे गरजेचे आहे.प्रशांत चासकर,कृषी पणन तज्ज्ञ, पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी