शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

राज्यातील शेतकरी कंपन्यांची दोनशे कोटींची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:14 IST

अकोला : बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या राज्यात दोन हजारांवर कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, यातील १८४ कंपन्यांनी आजमितीस २०४ कोटींची उलाढाल केली आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या राज्यात दोन हजारांवर कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, यातील १८४ कंपन्यांनी आजमितीस २०४ कोटींची उलाढाल केली आहे. काही कंपन्यांनी शेतमालाची थेट परदेशात निर्यात सुरू केली आहे. यात विदर्भातील अकोला जिल्ह्यातील शेतकरी कंपनीचा समावेश आहे; पण शेतकरी गटांना प्रोत्साहन देणारा प्रकल्पच बंद करण्यात आला आहे.शेतकऱ्यांनी बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाद्वारे करण्यात आले होते. शेतकरी गटाच्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पणन मंडळ, आत्मा व खासगी कंपन्यांनी काम केले. शेतकरी कंपन्यांना प्रोत्साहन व भांडवलाची गरज पूर्ण व्हावी, याकरिता राज्याच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला; पण ज्या उद्देशासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला होता, तो प्रकल्पच बंद पडला आहे. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली होती. आता दोन महिन्यांपासून प्रकल्प ठप्प आहे. याच प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपन्यांनी २०४ कोटींची उलाढाल केली आहे. असे असले तरी बºयाच कंपन्या मागे पडल्या आहेत. जागतिक बँकेच्या प्रकल्पासह शासनाने शेतकरी कंपन्यांना कृषी विभागातून योजना दिल्या. आता शेतकरी कंपन्यांच्या भागधारकांनी शेतकरी विकासाच्या दृष्टीने पुढे येणे गरजेचे आहे. शासनानेही कायमस्वरू पी एक अधिकारी तालुका, जिल्हा स्तरावर देण्याची गरज आहे. पणन मंडळाने जेवढ्या संचालकांना निर्यातीचे विनामूल्य प्रशिक्षण दिले. त्यांनीदेखील निर्यातीचे काम सुरू करण्याची गरज आहे.- अकोल्याच्या ‘नरनाळा’ची निर्यात!राज्यात नाशिक येथील अ‍ॅग्रो शेतकरी कंपनी आशिया खंडातील पहिल्या पाचमध्ये द्राक्ष निर्यात करणारी कंपनी असून, महाएफपीसी कंपनी कांदा विक्रीत अग्रेसर आहे. ही कंपनी केरळ, चेन्नई येथे कांदा पाठवित आहे. अकोला-अकोट येथील नरनाळा कंपनीने केळी व डाळिंब निर्यातीत पाऊल टाकले आहे. दरम्यान, खासगी, सार्वजनिक भागेदारीचा २५ कोटींचा प्रकल्प यासाठी मंजूर करण्यात आला आहे. कंपन्यांनी आता अनुदानावर अवलंबून न राहता खासगी कंपन्यांप्रमाणे काम करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- राज्यात दोन हजारांवर शेतकरी कंपन्यांचे जाळे विणण्यात आले असून, १८४ कंपन्यांची २०० कोटींच्यावर उलाढाल सुरू आहे. निर्यातही सुरू आहे. आता भागधारकांनी ताकदीनिशी पुढे येणे गरजेचे आहे.प्रशांत चासकर,कृषी पणन तज्ज्ञ, पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी