शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
5
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
6
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
7
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
8
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
9
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
10
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
11
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
12
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
13
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
14
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
15
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
16
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
17
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
18
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
19
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
20
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप

शेतकऱ्यांनो सावधान...दर आठवड्याला दोघांना होते फवारणीतून विषबाधा

By रवी दामोदर | Updated: August 3, 2023 13:56 IST

शेतशिवारात फवारणीला वेग : जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत बांधावर जनजागृती

रवी दामोदर

अकोला : यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या असून, शेतशिवारात पिके डोलत आहेत. सध्या फवारणीला वेग आला असून, विषबाधा होण्याच्या घटनाही समोर येत आहेत. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन जणांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात गतवर्षी दर आठवड्याला दोघांना फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहे. गतवर्षी मिळून आतापर्यंत ८० जणांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. उपचारानंतर सर्वजण बरे झाले, परंतु, फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांचा वापर सर्रास वाढत आहे. मजुरी महागल्याने तणनाशकाकडे शेतकरी वळला आहे. गत तीन-चार वर्षांमध्ये फवारणीमुळे विषबाधा होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून लक्षात येते. यंदाच्या खरीप हंगामातील पिके शेतात डोलत असून, कीटक, तणांपासून पिकांचे रक्षण व्हावे, यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. यादरम्यान फवारणी करताना शेतकरी- शेतमजूर योग्य ती काळजी घेत नसल्याने अनेकांना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात एकूण ७८ व यंदा २ शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे आहे. या सर्व रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच काही जणांवर खासगी रुग्णालयात देखील उपचार झाल्याची माहिती असून उपचारांती हे सर्वजण बरे झाले आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीAkolaअकोला