शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

कर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:08 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्‍यांना दिले.

ठळक मुद्देकिशोर तिवारी यांचे निर्देशजिल्हय़ातील कामाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्‍यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्हय़ात पात्र ठरलेले आणि अपात्र ठरलेले शेतकरी, यासंदर्भात आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, याबाबत दखल घेण्याचे निर्देश देत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना टप्प्या-टप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने झालेला शेतकर्‍यांचा मृत्यू, कापूस-सोयाबीनची हमीभावाने खरेदी, शाश्‍वत शेती व विषमुक्त शेती अभियान आणि मुद्रा बँक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती इत्यादी विषयांचा  जिल्हय़ातील कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची माहितीही किशोर तिवारी यांनी घेतली. यावेळी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरे यांच्यासह कृषी व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढीसाठी जागृती करा!फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. फवारणीसाठी कीटकनाशकाचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबाबत जागृती करण्याचे सांगत, फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न केल्यास विषबाधा व त्यामुळे शेतकर्‍यांचा मृत्यू होणार नाही, यासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्याचेही तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी