शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:08 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्‍यांना दिले.

ठळक मुद्देकिशोर तिवारी यांचे निर्देशजिल्हय़ातील कामाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्‍यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्हय़ात पात्र ठरलेले आणि अपात्र ठरलेले शेतकरी, यासंदर्भात आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, याबाबत दखल घेण्याचे निर्देश देत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना टप्प्या-टप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने झालेला शेतकर्‍यांचा मृत्यू, कापूस-सोयाबीनची हमीभावाने खरेदी, शाश्‍वत शेती व विषमुक्त शेती अभियान आणि मुद्रा बँक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती इत्यादी विषयांचा  जिल्हय़ातील कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची माहितीही किशोर तिवारी यांनी घेतली. यावेळी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरे यांच्यासह कृषी व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढीसाठी जागृती करा!फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. फवारणीसाठी कीटकनाशकाचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबाबत जागृती करण्याचे सांगत, फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न केल्यास विषबाधा व त्यामुळे शेतकर्‍यांचा मृत्यू होणार नाही, यासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्याचेही तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी