शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

कर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:08 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्‍यांना दिले.

ठळक मुद्देकिशोर तिवारी यांचे निर्देशजिल्हय़ातील कामाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्‍यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्हय़ात पात्र ठरलेले आणि अपात्र ठरलेले शेतकरी, यासंदर्भात आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, याबाबत दखल घेण्याचे निर्देश देत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना टप्प्या-टप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने झालेला शेतकर्‍यांचा मृत्यू, कापूस-सोयाबीनची हमीभावाने खरेदी, शाश्‍वत शेती व विषमुक्त शेती अभियान आणि मुद्रा बँक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती इत्यादी विषयांचा  जिल्हय़ातील कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची माहितीही किशोर तिवारी यांनी घेतली. यावेळी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरे यांच्यासह कृषी व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढीसाठी जागृती करा!फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. फवारणीसाठी कीटकनाशकाचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबाबत जागृती करण्याचे सांगत, फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न केल्यास विषबाधा व त्यामुळे शेतकर्‍यांचा मृत्यू होणार नाही, यासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्याचेही तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी