शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:08 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्‍यांना दिले.

ठळक मुद्देकिशोर तिवारी यांचे निर्देशजिल्हय़ातील कामाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील कामाचा आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे अधिकार्‍यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्हय़ात पात्र ठरलेले आणि अपात्र ठरलेले शेतकरी, यासंदर्भात आढावा घेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, याबाबत दखल घेण्याचे निर्देश देत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना टप्प्या-टप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने झालेला शेतकर्‍यांचा मृत्यू, कापूस-सोयाबीनची हमीभावाने खरेदी, शाश्‍वत शेती व विषमुक्त शेती अभियान आणि मुद्रा बँक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्मिती इत्यादी विषयांचा  जिल्हय़ातील कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाची माहितीही किशोर तिवारी यांनी घेतली. यावेळी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरे यांच्यासह कृषी व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढीसाठी जागृती करा!फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न करता उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. फवारणीसाठी कीटकनाशकाचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबाबत जागृती करण्याचे सांगत, फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर न केल्यास विषबाधा व त्यामुळे शेतकर्‍यांचा मृत्यू होणार नाही, यासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्याचेही तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी