शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्हावे - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 17:57 IST

अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले.

अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्यावतीने पश्चिम विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी बोलताना डॉ. बोंडे यांनी विदर्भातील शेतकरी,कंपन्या,शसनाच्या विविध योजना आदी विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, मिनल अनिल बोेंडे यांची उपस्थिती होती. तसेच मंचावर डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले,डॉ.विलास खर्चे,डॉ.दिलीप मानकर,डॉ.महेंद्र नागदेवे,डॉ.प्रकाश कडू,कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश कंडारकर,विनायक सरनाईक यांची उपस्थिती होती.पश्चिम महाराष्टÑाचा आपण उदो-उदो करतो तथापि विदर्भाला १९६० पासून पाणीच मिळू दिले नाही.पाणीच नसल्याने ४५ अंश तापमानात येथील शेतकरी शेतात करणार काय?असा प्रश्न उपस्थित करताना आम्ही सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. एवढेच नव्हे तर पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भात पाणी आणण्याची वैनंगगा ते पैनगंगा योजना राबविण्यात येणार आहे.एवढेच नव्हे तर पश्चिम वाहिन्यांचे जे पाणी समुद्राला मिळते ते पाणी मराठवाड्यात आणण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.मागील सरकारच्या काळातील ५२ हजार कोटींच्या कर्जाचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच झाल्याची टिका करताना आम्ही मात्र संपूर्ण राज्याचा विचार करू न कर्जमाफी केल्याचे ते म्हणाले.हे सरकार शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, विविध योजना उद्योगासाठी मिळणारे अनुदान कर्जात वळते करू नये,यासाठीचे माझे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.पोहरे यांनी विदर्भात नियोजन नसल्याने येथील एक लाख कोटी रू पये दरवर्षी विदर्भाबाहेर जात आहेत.पश्चिम महाराष्टÑातील यशाच गमक समजून आपल्या शेतकºयांना वाटचाल करावी लागणार आहे.त्यांची देशी कापूस सोडून आपण एच-४,बीटी च्या मागे लागल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आता तर एचटीबीटी कापसाच्या माध्यमातून शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. मिनल बोंडे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मितीकरीता आर्थिक नियोजन पध्दती या विषयावर तर डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.संचालन डॉ.प्रदीप बोरकर यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAnil Bondeअनिल बोंडेAgriculture Sectorशेती क्षेत्र