शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्हावे - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 17:57 IST

अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले.

अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्यावतीने पश्चिम विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी बोलताना डॉ. बोंडे यांनी विदर्भातील शेतकरी,कंपन्या,शसनाच्या विविध योजना आदी विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, मिनल अनिल बोेंडे यांची उपस्थिती होती. तसेच मंचावर डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले,डॉ.विलास खर्चे,डॉ.दिलीप मानकर,डॉ.महेंद्र नागदेवे,डॉ.प्रकाश कडू,कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश कंडारकर,विनायक सरनाईक यांची उपस्थिती होती.पश्चिम महाराष्टÑाचा आपण उदो-उदो करतो तथापि विदर्भाला १९६० पासून पाणीच मिळू दिले नाही.पाणीच नसल्याने ४५ अंश तापमानात येथील शेतकरी शेतात करणार काय?असा प्रश्न उपस्थित करताना आम्ही सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. एवढेच नव्हे तर पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भात पाणी आणण्याची वैनंगगा ते पैनगंगा योजना राबविण्यात येणार आहे.एवढेच नव्हे तर पश्चिम वाहिन्यांचे जे पाणी समुद्राला मिळते ते पाणी मराठवाड्यात आणण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.मागील सरकारच्या काळातील ५२ हजार कोटींच्या कर्जाचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच झाल्याची टिका करताना आम्ही मात्र संपूर्ण राज्याचा विचार करू न कर्जमाफी केल्याचे ते म्हणाले.हे सरकार शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, विविध योजना उद्योगासाठी मिळणारे अनुदान कर्जात वळते करू नये,यासाठीचे माझे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.पोहरे यांनी विदर्भात नियोजन नसल्याने येथील एक लाख कोटी रू पये दरवर्षी विदर्भाबाहेर जात आहेत.पश्चिम महाराष्टÑातील यशाच गमक समजून आपल्या शेतकºयांना वाटचाल करावी लागणार आहे.त्यांची देशी कापूस सोडून आपण एच-४,बीटी च्या मागे लागल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आता तर एचटीबीटी कापसाच्या माध्यमातून शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. मिनल बोंडे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मितीकरीता आर्थिक नियोजन पध्दती या विषयावर तर डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.संचालन डॉ.प्रदीप बोरकर यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAnil Bondeअनिल बोंडेAgriculture Sectorशेती क्षेत्र