शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हताश शेतकऱ्याने दोन एकर उभ्या केळी पिकात फिरवला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 14:58 IST

तेल्हारा : तालुक्यातील अकोली रूपराव या गावातील एका शेतकऱ्याने पिकांवर येणाऱ्या संकटाला कंटाळून अखेर दोन एकर केळी च्या बागेत रोटाव्हेटर मारले.

- सत्यशील सावरकरतेल्हारा : तालुक्यातील अकोली रूपराव या गावातील एका शेतकऱ्याने पिकांवर येणाऱ्या संकटाला कंटाळून अखेर दोन एकर केळी च्या बागेत रोटाव्हेटर मारले. याच वर्षी बागायती कपाशीवर सुद्धा बोगस कीटकनाशक फवारणी केल्याने या शेतकऱ्यांचे उभे पिक करपले होते.       रूपेश लासुरकार हा अल्प भूधारक युवा शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेती व्यतिरिक्त  गावातील शेजारी शेतकऱ्यांचे शेत बटाइने करित मोठ्या मेहनतीने पिक घेवून आर्थिक घडी सुधारण्यासाठी प्रयत्न करित असताना त्याला विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी शेतात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी दोन एकर केळी लागवड जुन महिन्यात केली सुरूवातीपासून पिकाची निगा राखून पिक जोमाने वाढविले; परंतु काही महिन्यातच केळी पिकावर अळी आली. त्याचा बंदोबस्त करित नाहीतोच पुन्हा वातावरणातील बदलाने करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या साठी महागडे औषधे वापरून फवारणी केली. त्या दरम्यान आवश्यक आतंरमशागत करून रासायनिक खतांची मात्रा दिली.एवढे करूनही पुन्हा पिकावर खोडकिडा आला. हजारो रूपये खर्चून पिक सुकत असल्याचे पाहवले नाही.  मोठ्या जड अंतकरणाने अखेर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवून पिक नष्ट करावे लागेल, अशा परिस्थितीत खचून न जाता पुन्हा शेतात रब्बी हंगामात पिक घेण्याची तयारी करण्याचे रूपेश लासुरकार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे याच वर्षी या शेतकऱ्यांचे कपाशी पिकाचे बोगस कीटकनाशक दिल्या गेल्याने उभे पिक करपून नुकसान झाले होते हे विशेष.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा