शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

एक किमी चिखल तुडवत आणावे लागते सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:38 IST

सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

- राहूल सोनोने

दिग्रस बु.: गुडघ््यापर्यंत चिखल, ठिकठिकाणी पाणी, त्यातून ३० ते ३५ किलो सोयाबीन गठ्ठे डोक्यावर घेऊन जात असलेले शेतकरी, असे चित्र दिग्रस बु. सह पातूर तालुक्यात दिसत आहे. सततच्या पावसाने शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पातूर तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे उभ्या पिकांना कोंब फुटले आहेत. शेतरस्त्यावर चिखल साचल्याने शेतकºयांना शेतमाल घरी आणताना कसरत करावी लागत आहे. एक ते दोन किमी चिखल तुडवत शेतमाल डोक्यावर वाहून शेतकरी घरी आणत आहे.पातूर तालुक्यातीन अनेक शेतकºयांनी सोयाबीन सोंगणी करून शेतात ठेवले होते. या सोयाबीनला सततच्या पावसामुळे कोंब फुटले आहेत. पावसामुळे खराब झालेले सोयाबीन आणण्यासाठीही शेतकºयांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. शेती मशागतीची कामे ठप्प असल्याने शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी उसंत देताच दिग्रस बु. परिसरात शेतकºयांनी शेतात धाव घेतली. तालुक्यातील सर्वच शेतरस्त्यांवर चिखल साचल्याने बैलगाडी तर दूरच साधे चालताही येत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शेतकरी एक ते दोन किमी चिखल तुडवत शेतमाल घरी आणत आहेत. पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा जास्त सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित ३० टक्के सोयाबीन घरी आणण्यासाठी चिखल तुडवावा लागत आहे.

खर्चही वाढलापावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले आहेत, तसेच दर्जाही घसरला आहे. अशा स्थितीत या सोयाबीनला चांगला भाव मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. शेतात पडून असलेला शेतमाल घरी आणणे शेतकºयांना शक्य नाही. त्यामुळे मजूर लावून हा माल घरी आणण्यात येत आहे. चिखल व पाण्यात जाण्यासाठी मजूर वेगळी मजुरी मागत असल्याने शेतकºयांचा खर्च वाढला आहे. भावाची शाश्वती नसताना शेतकरी हा खर्च करीत असल्याने आणखी एक संकट शेतकºयांवर आले आहे. परिसरातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी राहुल गावंडे, रामा गावंडे आदींनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmer strikeशेतकरी संप