शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

विदर्भातील प्रसिद्ध पानवेली देशात फुलणार : अकोट येथे संशोधन केंद्र ; क्षेत्र वाढीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:32 IST

अकोला: विदर्भातील पानवेली देशात प्रसिद्ध आहे; परंतु मागील काही वर्षात याकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो हेक्टरवरील हे क्षेत्र कमी झाले,भरघोस उत्पादन व उत्पन्न देणार्‍या पानवेली  मळ्य़ांचा आता विकास करण्यात येणार असून, नव्याने संशोधन करण्यासाठी अकोला जिल्हय़ातील दिवठाणा पानवेली संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा येथे हलविण्यात येत आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्हय़ातील दिवठाणा पानवेली संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाणार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भातील पानवेली देशात प्रसिद्ध आहे; परंतु मागील काही वर्षात याकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो हेक्टरवरील हे क्षेत्र कमी झाले,भरघोस उत्पादन व उत्पन्न देणार्‍या पानवेली  मळ्य़ांचा आता विकास करण्यात येणार असून, नव्याने संशोधन करण्यासाठी अकोला जिल्हय़ातील दिवठाणा पानवेली संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा येथे हलविण्यात येत आहे.पानवेली हे नगदी बहुवर्षीय वेलवर्गीय पीक असून, विदर्भातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर व चंद्रपूर जिल्हय़ात पारंपरिक पद्धतीने लागवड केली जाते. अकोट तालुक्यात कपुरी व बंगला या दोन जातीची लागवड  शेतकरी करतात, या प्रसिद्ध पानांची देशात मागणी असून,  एका एकरात १२ ते १५ लाख रुपये उत्पादन होत असल्याचा कृषी शास्त्रज्ञांचा दावा आहे. अकोला जिल्हय़ातील अकोट तालुका व अमरावती जिल्हय़ातील अंजनगाव भागात पाच हजार हेक्टरवर पानवेलीचे क्षेत्र होते. तथापि, तीव्र पाणी टंचाई, कृषी यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने आता हे क्षेत्र घटले असून, सध्या काही शेतकर्‍यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे पानवेलीचे १.६४ हेक्टर क्षेत्र टिकून आहे. याच क्षेत्राचा विकास करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी देवठाणा पानवेली संशोधन केंद्र बळकट क रण्याचा निर्णय घेतला असून, पूर्व विदर्भातील संशोधन केंद्र दिवठाणा केंद्राला जोडले जाणार. 

कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान विकसितसंशोधन केंद्रात कमी खर्चाचे लागवड व व्यवस्थापन  तंत्रज्ञान  विकसित केले जाणार असून, एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन संशोधन केले जाईल, तसेच रोग प्रतिबंधक जाती विकसित केल्या जातील. सिंचन, पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान विकासावर भर दिला जाईल. उत्पादकता व पानाची साठवण क्षमता वाढविणे, तसेच औषध गुणधर्माचा अभ्यासही होईल.

पानवेलीत औषध गुणधर्म नागवेली, पानवेलीच्या पानात अ,ब व क जीवनसत्व विपूल प्रमाणात असून,पानामध्ये पाचन, मुखशुद्धी, शक्ती, कामवर्धक औषध गुणधर्म आहेत, तसेच डोके दुखणे, वात, हृदयकळा यासाठी उपयोग केला जातो. धार्मिक प्रसंगात या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

औषध गुणधर्म असलेल्या कपुरी, बंगाली पानाला मागणी असून, बाजार भाव चांगले आहेत. संशोधन केंद्राचे बळकटीकरण झाल्यास खारपाणपट्टय़ातील पानमळ्य़ांचा विकास व क्षेत्र वाढीवर भर दिला जाईल. शेतकर्‍यांना कमी खर्चाचे लागवड तंत्रज्ञान पुरविण्यात येईल.डॉ.एम.एस. जोशी,प्रमुख, पानवेली संशोधन केंद्र, डॉ. पंदेकृवि, दिवठाणा, ता. अकोट, जि.अकोला.

टॅग्स :agricultureशेती