शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

वीस वर्षापासून दूरावलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले, विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार 

By राजेश शेगोकार | Updated: March 4, 2023 16:59 IST

संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली.  एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे.

अकोला : वडिलाेपार्जित संपत्तीच्या वादात भाऊ-बहीण, आई आणि मुलगी  एकमेकांच्या विरोधात कार्टात गेले, वाद विकाेपाला गेल्याने संवाद बंद झाला, वाद संपतील अन् पुन्हा पूर्वी सारखे हाेईल ही आशा काेणालाच नव्हती उलट राग, द्वेषाची जागा वैमनस्याने घेतली हाेती अशा स्थितीत या परिवारातील एका सदस्याला विधी सेवा प्राधिकारणाच्या रूपाने एक आशेचा किरण दिसताे, ताे पुढाकार घेताे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश  पैठणकर हे या परिवारातील गुंता साेडविण्यासाठी पुढे येतात अन् त्यांच्या समुपदेशनाद्वारे तब्बल २० वर्षापासून विखुरलेला परिवार एकत्र येताे. 

संपत्तीच्या वादावर संवादाची गाेळी कामी आल्याने वीस वर्षांपासून दूरावलेल्या कुटुंबांने वैराची हाेळी केली.  एखाद्या चित्रपटात घडावा असा हा प्रसंग अकाेल्यात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील एका गावातील प्रतिष्ठित कुटुंब असलेले भाऊ-बहीण, आई आणि मुलगी संपत्तीसाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. जिल्हा न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय या ठिकाणी खटले सुद्धा दाखल केले होते. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ते एकमेकांचे वैरी बनले होते. बहिण भावाच्या पवित्र नात्याला कधीचाच सुरुंग लागला होता तर मुलाच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणारी आई आपल्या पोटच्या गोळ्यापासून कधीच दूर झाली होती. तीन भाऊ दोन बहिणी आणि आई वडील असा हा परिवार आहे. यापैकी वडीलाचे आधीच निधन झाले तर घरातील कुटुंबप्रमुख असलेल्या आईचे सुद्धा आजाराने निधन  पैठणकर एका कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांनी घरगुती वादविवाद कसे मिटवावीत ? याबाबत मार्गदर्शन केले होते. तसेच ज्या लोकांना असे तंटे सोडवण्यासाठी मदत हवी असेल तर त्यांनी संपर्क करावा अशी आवाहन केले होते. हाच धागा पकडून या विखुरलेल्या कुटुंबातील एका सदस्याने  पैठणकर यांच्याशी संपर्क साधला व अश्रू भरल्या नयनांनी आपली कहाणी कथन केली. त्यांने सांगितले की, आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी असून आई वडील देवा घरी गेले आहेत.

मात्र संपत्ती व कौटुंबिक करण्यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षापासून एकमेकांसोबत बोलत नाही. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश  पैठणकर यांनी या कुटुंबाला जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात बोलावले. या सर्व मंडळींना कायदेशीर मार्गदर्शन केले. वाद विवादामुळे कुटुंब कसे उध्वस्त होतात, याबाबत त्यांनी जाणीव करून दिली. तुम्ही सर्व भावंडांनी पुन्हा एकत्र गुण्यागोविंदाने नांदावे यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अनमोल मार्गदर्शन केले आणि या भावंडांना हा सल्ला पटला. अखेर तीन भाऊ आणि दोन बहिणींनी एकमेकांना मिठी मारली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी आनंदाला वाट मोकळी करून दिली. हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग नुकताच विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामध्ये अनेकांनी अनुभवला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे या भावंडांनी आभार मानले. 

टॅग्स :AkolaअकोलाFamilyपरिवारCourtन्यायालय