शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंंकष प्रयत्न: तिवारी

By admin | Updated: September 10, 2015 01:48 IST

स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून सर्वंंकष प्रयत्न केले जाणार असल्याची किशोर तिवारी यांची ग्वाही.

वाशिम : शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांनी विदर्भ-मराठवाडा हादरला आहे. यामागील नेमक्या कारणांचा शोध घेवून शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी शेतकरी स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून सर्वंंकष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. ९ सप्टेंबर रोजी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या हा चिंतेचा आहे. यांसंदर्भात शासन गंभीर असून सर्वसामान्य शेतकरी कुटूंब तद्वतच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांकरिता शासनस्तरावरुन विविध योजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अन्नसुरक्षा, आरोग्य, शिक्षण या सुविधांचा समावेश आहे. सद्यस्थितीत सर्वसामान्य जनता तसेच शेतकर्‍यांचा राजकीय नेते आणि अधिकार्‍यांवर विश्‍वास राहिलेला नाही. मृतकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार यापूर्वी अनेकदा घडल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांना ह्यब्रॅण्ड अँम्बेसिडरह्ण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले. शेतकरी स्वावलंबन मिशनअंतर्गत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसह विदर्भातील वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत शेतकर्‍यांना जाणवणार्‍या अडचणी, त्यांना शासनाकडून कुठले सहकार्य अपेक्षित आहे यासह शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागील नेमक्या कारणांचा शोध घेवून तसा परिपूर्ण अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाईल. एवढेच नव्हे; तर शेतकर्‍यांना पतपुरवठा वेळेवर व्हायला हवा, सिंचनाकरिता पुरेसे पाणी मिळावे, त्याने उत्पादित केलेल्या मालाला हमीभाव मिळावा, शासनस्तरावरुन जाहीर होणार्‍या योजनांचा कुठल्याही अडचणीविना लाभ मिळावा, आदींकरिता यापुढेही लढा सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती.

*कामचुकार अधिका-यांवर कारवाई व्हायलाच हवी

         पावसातील अनियमिततेमुळे खरिप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले . अशाही अवस्थेत काही शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय असताना त्यांना पुरेशी वीज मिळत नाही. ह्यइन्फ्रा-२ह्ण च्या कामांची गती मंदावल्याने शेतकर्‍यांना ह्यट्रान्सफार्मरह्ण मिळणे कठीण झाले आहे. आजही अनेक बँकांनी अद्यापही शेतकर्‍यांना पिकविम्याचा लाभ दिलेला नाही. एकूणच या सर्व बाबींचा शेतीवर विपरित परिणाम होत असून वाशिम जिल्ह्यात एकट्या ऑगस्ट महिण्यांत १४ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यासाठी कारणीभूत असलेल्या संबंधित विभागातील कामचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशा सूचना आपण शासनाकडे केल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली.