शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंंकष प्रयत्न: तिवारी

By admin | Updated: September 10, 2015 01:48 IST

स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून सर्वंंकष प्रयत्न केले जाणार असल्याची किशोर तिवारी यांची ग्वाही.

वाशिम : शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांनी विदर्भ-मराठवाडा हादरला आहे. यामागील नेमक्या कारणांचा शोध घेवून शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी शेतकरी स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून सर्वंंकष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. ९ सप्टेंबर रोजी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या हा चिंतेचा आहे. यांसंदर्भात शासन गंभीर असून सर्वसामान्य शेतकरी कुटूंब तद्वतच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांकरिता शासनस्तरावरुन विविध योजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अन्नसुरक्षा, आरोग्य, शिक्षण या सुविधांचा समावेश आहे. सद्यस्थितीत सर्वसामान्य जनता तसेच शेतकर्‍यांचा राजकीय नेते आणि अधिकार्‍यांवर विश्‍वास राहिलेला नाही. मृतकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार यापूर्वी अनेकदा घडल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांना ह्यब्रॅण्ड अँम्बेसिडरह्ण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले. शेतकरी स्वावलंबन मिशनअंतर्गत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसह विदर्भातील वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत शेतकर्‍यांना जाणवणार्‍या अडचणी, त्यांना शासनाकडून कुठले सहकार्य अपेक्षित आहे यासह शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागील नेमक्या कारणांचा शोध घेवून तसा परिपूर्ण अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाईल. एवढेच नव्हे; तर शेतकर्‍यांना पतपुरवठा वेळेवर व्हायला हवा, सिंचनाकरिता पुरेसे पाणी मिळावे, त्याने उत्पादित केलेल्या मालाला हमीभाव मिळावा, शासनस्तरावरुन जाहीर होणार्‍या योजनांचा कुठल्याही अडचणीविना लाभ मिळावा, आदींकरिता यापुढेही लढा सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती.

*कामचुकार अधिका-यांवर कारवाई व्हायलाच हवी

         पावसातील अनियमिततेमुळे खरिप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले . अशाही अवस्थेत काही शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय असताना त्यांना पुरेशी वीज मिळत नाही. ह्यइन्फ्रा-२ह्ण च्या कामांची गती मंदावल्याने शेतकर्‍यांना ह्यट्रान्सफार्मरह्ण मिळणे कठीण झाले आहे. आजही अनेक बँकांनी अद्यापही शेतकर्‍यांना पिकविम्याचा लाभ दिलेला नाही. एकूणच या सर्व बाबींचा शेतीवर विपरित परिणाम होत असून वाशिम जिल्ह्यात एकट्या ऑगस्ट महिण्यांत १४ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यासाठी कारणीभूत असलेल्या संबंधित विभागातील कामचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशा सूचना आपण शासनाकडे केल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली.