शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

पारस प्रकल्पाचा विस्तार करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा - शिवसंग्राम

By admin | Updated: July 14, 2017 01:11 IST

बाळापूर : पारस प्रकल्पाचा विस्तार करा, अन्यथा पारस प्रकल्पासाठी भूसंपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे.

बाळापूर : पारस प्रकल्पाचा विस्तार करा, अन्यथा पारस प्रकल्पासाठी भूसंपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पारस प्रकल्पाच्या विस्तारासाठी १२५ हेक्टर शेतजमीन १४१ शेतकऱ्यांकडून संपादित केली आहे. याबाबत मागील महिन्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पाला भेट देऊन पारस येथील प्रकल्पाची पाहणी करून अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पारस येथे ६६० मेगावॅटचा प्रकल्प करण्याचे जाहीर केले होते; परंतु १० जुलै रोजी मंत्रालयातील ऊर्जामंत्र्यांच्या सदनात पारस येथे औष्णिक वीज प्रकल्पाऐवजी २५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातला आहे. यामुळे हा सौर ऊर्जा प्रकल्प पारस प्रकल्पाच्या व शेतकऱ्यांच्या बेरोजगाराच्या अहिताचा आहे. भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या व आता वीज प्रकल्पाने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन आता मागे पडणार आहे, त्यामुळे भविष्यात या कुटुंबाची उपासमारी होणार आहे.पारस येथे पूर्वीच ५०० मेगावॅटचा प्रकल्प सुरू आहे. नव्याने होणाऱ्या ६६० मेगावॅट वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी मन नदीपात्रात दोन मोठी धरणे आहेत. त्याचं पुरेसं पाणी जमीन, रेल्वे व अधिकाऱ्यांची पुरेशी निवासस्थाने असताना शासन मनमानी करून पारस प्रकल्प येथे ऊर्जा प्रकल्पाऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प पुढे करीत आहे. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी अकोला येथे घोषणा केल्यानंतर ६६० मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्पाऐवजी आता २५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प करण्याची चर्चा करण्यात येत आहे.यापूर्वीही पारस येथील एक प्रकल्प भुसावळ येथे स्थलांतरीत करण्यात आला आहे. केवळ सौर उर्जेचा प्रकल्प झाल्यास त्यापासून जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही. हा प्रकल्प जिल्ह्याच्या अहिताचा ठरणार असल्याने शासनाने जाहीर केलेल्या औष्णिक प्रकल्पाच्या कामास प्रारंभ करावा, अन्यथा १४१ शेतकऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांच्यावतीने शिवसंग्राम न्यायालयात जनहित याचिका दाखल करून जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे. कृ ती समितीच्या निर्णयानंतरच निर्णय -सिरस्कारबाळापूर : पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत कृ ती समितीने पारस औष्णिक वीज केंद्राबाबत निर्णय दिला होता. आता नव्याने राज्य शासन या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प करण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन असून, त्यावर पारस कृ ती समितीची पुढील आठवड्यात बैठक होऊन या बैठकीतून जनहितार्थ पुढील निर्णय घेऊ, असे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगितले. भूसंपादित शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत व त्यांच्या रोजगाराबाबत शासनासोबत कृ ती समितीच्यावतीने घेतलेले निर्णय ठेवून त्यावर आपण ठाम राहू, असेही सिरस्कार यांनी सांगितले.केवळ सौर ऊर्जा प्रकल्प केल्यास विरोध -तायडेबाळापूर : काँग्रेस आघाडी सरकारने १२०० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने शासन स्तरावरून योजना आखून तरतूद केली होती. युती सरकारने पारस येथे औष्णिक वीज प्रकल्पाचे विस्तारीकरण करून ६६० मेगावॅट वीज प्रकल्प सुरू करावा. त्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्प केल्यास शासनाचे स्वागत करू; पण ६०० मेगावॅटऐवजी केवळ २५ मेगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जा प्रकल्पातून केल्यास आम्ही विरोध करू. त्यासाठी १४१ शेतकऱ्यांची व कृ ती समितीची, बेरोजगारांची संयुक्त बैठक घेऊन जनआंदोलनाची दिशा ठरवू, असे काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रकाश तायडे यांनी सांगितले.