शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

सावलीही साथ सोडणार, अकोल्यात २३ मे रोजी शून्य सावलीचा अनुभव

By atul.jaiswal | Updated: May 15, 2023 14:37 IST

आपल्या देशात रांची, भोपाळ, झाशीच्या उत्तरेकडील भागात हा अनोखा अनुभव घेता येत नाही.

अकोला : सदैव साथ देणारी आपली सावली मंगळवार, २३ मे रोजी मंगळवारी दुपारी १२ वा. १८मिनिटांनी अचानक काही क्षणांसाठी नाहीशी झाल्याचा अनुभव अकोलेकरांना घेता येणार आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातील हे दोन दिवस शून्य सावलीचे असतात. ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यातील कोनिय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा असे वर्षातून दोन दिवस शून्य सावली दिनाचे येत असल्याचे खगोल अभ्यासक सांगतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. अकोलेकरांना दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी शून्य सावलीची अनुभूती घेता येणार आहे. उन्हाळ्यात घडणाऱ्या या घटनेला अधिक महत्त्व असुन पावसाळ्यातील घटना गौण मानल्या जाते. आपल्या देशात रांची, भोपाळ, झाशीच्या उत्तरेकडील भागात हा अनोखा अनुभव घेता येत नाही.

जिल्ह्यात शून्य सावलीचे चार दिवस

आपल्या जिल्ह्यात या अनोख्या खगोलीय घटनेचा आरंभ दक्षिण भागाकडून उत्तर बाजूस पुढे सरकत जाईल. सोमवार, २२ मे रोजी पातूर, महान, पिंजर या भागातुन होईल. दूसऱ्या दिवशी मंगळवार, २३ मे रोजी अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर,कूरूम या परिसरात, २४ मे रोजी दहिहांडा,चोहोट्टा,अंदूरा,हाता या पूर्णा नदीच्या पट्ट्यात व २५ मे रोजी तेल्हारा,अडगाव, अकोट,सावरा या भागातील लोकांना शून्य सावलीचा अनुभव दूपारी स्थान परत्वे दुपारी १२:१६ ते १२:१९ मिनिटांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना अवश्य घेता येईल.

टॅग्स :Akolaअकोला