शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनाही दिसला कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 16:38 IST

कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले.

अकोला: निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी प्रकाशित केल्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले. शिक्षणाचा दर्जा नाही. प्राचार्य-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि तेथील शेती, गायवाडा, कृषी अवजारे याचा आढावा घेतला. विद्यालयाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, कर्मचारी व प्राचार्यांमध्ये टोकाचे वाद असून, समन्वय नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. तसेच विद्यापीठाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांना दिसून आले. शेतीची पाहणी केली असता, ३३ हेक्टर शेतजमीन ही पडीत असल्याचे दिसून आले. सुपीक शेतीचा दर्जा खालावत असल्याचेही विनायक सरनाईक यांना दिसून आले. यासोबतच, त्यांनी निंबी मालोकार येथील ग्रामस्थांसोबत चर्चा केली असता, गावातील शेतकºयांनी त्यांच्या जमिनी कृषी तंत्र विद्यालयाला दान दिल्या; परंतु आता कृषी तंत्र विद्यालयाकडूनच त्यांना त्रास होत असल्याचे सांगितले.गुरांना जखमा, वैरण घ्यावे लागते विकतकृषी तंत्र विद्यालयाकडे सध्या ३६ गुरे आहेत. त्यात १0 बैल आहेत. यातील काही गुरांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या गुरांच्या चराईसाठी विद्यालयाकडे २४ एकर जमीन आहे. एवढी जमीन चराईसाठी उपलब्ध असताना आणि शेतीतील कुटार मोठ्या प्रमाणात निघत असताना, कृषी तंत्र विद्यालयाला गुरांसाठी वैरण विकत घ्यावे लागते.

शेती देखरेखीचा प्रभार ‘त्या’ प्राध्यापकाकडे कसा?कार्यकारी परिषद सदस्य विनायक सरनाईक यांनी भेटीदरम्यान प्राचार्यांकडून कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, विद्यालयातील अल्पदृष्टीबाधित प्राध्यापकाकडे शेती देखरेखीचा प्रभार असल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्या व्यक्तीला डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्याकडे शेती देखरेखीचा प्रभार कसा दिला आहे, असा प्रश्नही सरनाईक यांनी उपस्थित केला.

काय आढळून आले...कृषी विद्यापीठातील त्रिसदस्यीय समितीनेही केली चौकशीकृषी तंत्र विद्यालयातील कारभाराची चौकशी करण्यासाठी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने गुरुवारी निंबी मालोकार येथे जाऊन प्राचार्य, प्राध्यापकांची चौकशी केली. तसेच विद्यार्थ्यांकडूनही माहिती जाणुन घेतली. ही समिती कुलगुरूंना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कृषी तंत्र विद्यालयातील परिस्थिती गंभीर आहे. शेतकºयांच्या मुलांना शिक्षण देणारी व्यवस्थाच मोडकळीस आली आहे. शेतीसोबतच गुरांची अवस्था बिकट आहे. याकडे कृषी विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच अभ्यासू प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात.-विनायक सरनाईक, सदस्यकार्यकारी परिषद, डॉ. पंदेकृवि.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेती