शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनाही दिसला कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 16:38 IST

कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले.

अकोला: निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी प्रकाशित केल्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनाही कृषी तंत्र विद्यालयात गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले. शिक्षणाचा दर्जा नाही. प्राचार्य-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे.कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक सरनाईक यांनी बुधवारी कृषी तंत्र विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि तेथील शेती, गायवाडा, कृषी अवजारे याचा आढावा घेतला. विद्यालयाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, कर्मचारी व प्राचार्यांमध्ये टोकाचे वाद असून, समन्वय नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. तसेच विद्यापीठाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांना दिसून आले. शेतीची पाहणी केली असता, ३३ हेक्टर शेतजमीन ही पडीत असल्याचे दिसून आले. सुपीक शेतीचा दर्जा खालावत असल्याचेही विनायक सरनाईक यांना दिसून आले. यासोबतच, त्यांनी निंबी मालोकार येथील ग्रामस्थांसोबत चर्चा केली असता, गावातील शेतकºयांनी त्यांच्या जमिनी कृषी तंत्र विद्यालयाला दान दिल्या; परंतु आता कृषी तंत्र विद्यालयाकडूनच त्यांना त्रास होत असल्याचे सांगितले.गुरांना जखमा, वैरण घ्यावे लागते विकतकृषी तंत्र विद्यालयाकडे सध्या ३६ गुरे आहेत. त्यात १0 बैल आहेत. यातील काही गुरांना गंभीर जखमा झाल्या आहेत. या गुरांच्या चराईसाठी विद्यालयाकडे २४ एकर जमीन आहे. एवढी जमीन चराईसाठी उपलब्ध असताना आणि शेतीतील कुटार मोठ्या प्रमाणात निघत असताना, कृषी तंत्र विद्यालयाला गुरांसाठी वैरण विकत घ्यावे लागते.

शेती देखरेखीचा प्रभार ‘त्या’ प्राध्यापकाकडे कसा?कार्यकारी परिषद सदस्य विनायक सरनाईक यांनी भेटीदरम्यान प्राचार्यांकडून कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, विद्यालयातील अल्पदृष्टीबाधित प्राध्यापकाकडे शेती देखरेखीचा प्रभार असल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्या व्यक्तीला डोळ्यांनी दिसत नाही, त्याच्याकडे शेती देखरेखीचा प्रभार कसा दिला आहे, असा प्रश्नही सरनाईक यांनी उपस्थित केला.

काय आढळून आले...कृषी विद्यापीठातील त्रिसदस्यीय समितीनेही केली चौकशीकृषी तंत्र विद्यालयातील कारभाराची चौकशी करण्यासाठी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने गुरुवारी निंबी मालोकार येथे जाऊन प्राचार्य, प्राध्यापकांची चौकशी केली. तसेच विद्यार्थ्यांकडूनही माहिती जाणुन घेतली. ही समिती कुलगुरूंना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कृषी तंत्र विद्यालयातील परिस्थिती गंभीर आहे. शेतकºयांच्या मुलांना शिक्षण देणारी व्यवस्थाच मोडकळीस आली आहे. शेतीसोबतच गुरांची अवस्था बिकट आहे. याकडे कृषी विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच अभ्यासू प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात.-विनायक सरनाईक, सदस्यकार्यकारी परिषद, डॉ. पंदेकृवि.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेती