शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पीक विम्याच्या लाभातून कुरणखेड महसूल मंडळाला वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:39 IST

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले.

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात संबंधित अधिकाºयावर कारवाई करून, पीक विम्याच्या लाभासाठी या महसूल मंडळाला समाविष्ट करण्याची मागणी कुरखेड महसूल मंडळातील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.गतवर्षीच्या खरीप हंगामात कुरणखेड महसूल मंडळांतर्गत गावांमधील शेतकºयांनी मूग, उडीद, तूर, ज्वारी, सोयाबीन व कपाशी इत्यादी पिकांचा विमा काढला आहे; परंतु जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने आणि सर्वच महसूल मंडळातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असताना अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभासाठी वगळण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत या महसूल मंडळातील शेतकºयांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची वस्तुस्थिती असताना पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळातील शेतकºयांना वगळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात संबंधित विमा कंपनीला जाब विचारून संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी आणि पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळाला समाविष्ट करण्याची मागणी या महसूल मंडळातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार, अ‍ॅड. संतोष राहाटे, अरुंधती शिरसाट, कोठारी येथील सरपंच महेंद्र इंगळे, दुधलमचे सरपंच रवींद्र पंडित, देवळीचे विकास सदांशिव, पातूर नंदापूरचे माजी उपसरंपच पंकज मुळे, सुकळी नंदापूरचे माजी सरपंच विठ्ठल सारसे, कानशिवणीचे माजी सरपंच रावसाहेब अवचार, प्रवीण वाहुरवाघ, देवळीचे देवानंद सदांशिव, बोरगाव खुर्दचे सतीश चोपडे, दिनेश मुळे, सुखदेवराव दामोदर, सचिन लाखे, गजानन काकड, संदीप गावंडे, उल्हास सदांशिव, धनराज पंडित यांच्यासह कुरणखेड महसूल मंडळांतर्गत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.अन्यथा २७ जूनपासून आंदोलनाचा इशारा!पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळाला समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा २७ जूनपासून या महसूल मंडळांतील शेतकरी पीक विम्याचा लाभ मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी दिला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाRevenue Departmentमहसूल विभाग