शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बाळापूर तालुक्यात पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीजवळच उत्खनन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:20 IST

बाळापूर : पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीपासून शंभर मीटरच्या आत उत्खनन करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे; मात्र कवठा येथील नदीपात्रात बॅरेजच्या कामासाठी पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीच्या पाच ते दहा फुटांवरच मोठा खड्डा खोदून उत्खनन करण्यात येत असल्याचे लोकमतने ८ डिसेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. 

ठळक मुद्दे१00 मीटरपर्यंत बंदी असताना पाच फुटावर खोदला खड्डाकवठा बहादुरा नदीपात्रातील प्रकार स्टिंग ऑपरेशन

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीपासून शंभर मीटरच्या आत उत्खनन करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे; मात्र कवठा येथील नदीपात्रात बॅरेजच्या कामासाठी पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीच्या पाच ते दहा फुटांवरच मोठा खड्डा खोदून उत्खनन करण्यात येत असल्याचे लोकमतने ८ डिसेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. कवठा बॅरेजचे काम सध्या सुरू आहे. या बॅरेजच्या कामासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एका कंत्राटदाराने रेती पुरवण्याचा कंत्राट घेतला आहे. पाणी पुरवठा योजनेच्या जवळपास १00 मीटरपर्यंत उत्खनन करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी लादलेली आहे; मात्र तरीही कवठा गावाला पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीजवळ मोठा खड्डा खोदून उत्खनन करण्यात येत असल्याचे लोकमतने ८ डिसेंबर रोजी केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. या खड्डय़ांमुळे विहिरी खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच कवठा गावात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यातच ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशात या खड्डय़ांमुळे विहीर कोसळल्यास गावात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. विहिरींपासून अवघ्या पाच ते दहा फुटांवरच मोठा खड्डा खोदून रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या खड्डय़ांतून रेतीचे उत्खनन होत असताना महसूल विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.कवठा गाव खारपाणपट्टय़ात येत असून, नदीपात्रातील पाण्यावरच ग्रामस्थांची तहान भागवल्या जाते. ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी नदीच्या पात्रात विहीर खोदण्यात आलेली आहे. या विहिरीच्या बाजूलाच मोठमोठे खड्डे खोदून रेतीचे उत्खनन करण्यात येत असल्याचे समोर आले.

कवठा येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीजवळ रेती उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल. - दीपक पुंडे, तहसीलदार, बाळापूर.

कवठय़ाच्या रॉयल्टीवर लोहार्‍यात उत्खनन!लोहारा येथील नदी पात्रातील रेती घाटातील स्थळांचा लिलाव झालेला नसताना कवठय़ा येथील स्थळांच्या रॉयल्टीवर रेतीचे उत्खनन करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. उत्खनन करण्यासाठी नदीपात्रात २0 ते २५ फूट खड्डे खोदण्यात येत आहेत. त्यामुळे, त्यामध्ये मजूर दबून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  लोहारा रेतीघाट लिलाव झाला नसताना कवठा घाटाच्या रॉयल्टीवर त्यांना लांबी ६00 मीटर रुंदी ६ मी. व खोल 0.५0 मीटर रेती उत्खननाचा आदेश असताना सर्रास या घाटावरून २0 ते २५ फूट खोल खड्डे करून, अवैध रेती उत्खनन सुरू आहे. याबाबत शेतकर्‍यांनी विचारपूस केली असता आमचेजवळ कवठय़ाची रॉयल्टी असल्याचे ते सांगतात, या घटनास्थळावर मंडळ अधिकारी पी. एम. मांजरे, तलाठी भानुदास म्हस्के यांनी दोन वेळा पाहणी केली.  मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. 

 मोठ मोठे खड्डे  खोदून अवैध रेती उत्खनन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच  रेती चोरावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करू. - डी.पी. पुंडे, तहसीलदार बाळापूर-

टॅग्स :BalapurबाळापूरAkola Ruralअकोला ग्रामीण