शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

परीक्षांचा खेळ, सीईटी अर्जाची मुदत आधी, बारावीचा निकाल नंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 10:22 IST

Education Sector News : विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ उडाला असून, अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही.

अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे शिक्षणक्षेत्रात माेठी उलथापालथ झाली असून, परीक्षांचा खेळ झाला आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी - सीईटी परीक्षेपासून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली आणि इयत्ता बारावीचा निकाल ४ ऑगस्टला जाहीर झाला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये गाेंधळ उडाला असून, अनेक विद्यार्थ्यांना अर्जच करता आला नाही.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येते. यावर्षी काेराेनामुळे इयत्ता १२वीचे निकाल रखडले हाेते. इयत्ता १२वीचे निकाल लागण्यापूर्वीच सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै राेजी संपली. त्यानंतर इयत्ता १२वीचा निकाल ४ ऑगस्ट राेजी जाहीर करण्यात आला. यावर्षी १२वी उत्तीर्ण झालेले हजाराे विद्यार्थी या परीेक्षेसाठी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी हाेत आहे.

अर्ज करण्यासाठी हवी मुदतवाढ

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपलेली हाेती. त्यामुळे, यावर्षी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले जिल्ह्यातील हजाराे विद्यार्थी सीईटीसाठी अर्ज करू शकलेले नाहीत. त्यामुळे, अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. त्यामुळे, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

 

सीईटीसाठी इच्छा असूनही अर्ज करता आला नाही. मुदत आधी हाेती व १२वीचा निकाल नंतर लागला, यात आमची काय चूक आहे. मुदत वाढली तर अर्ज करता येईल.

जयेश सरदार, विद्यार्थी

सीईटी परीक्षा महत्त्वाची आहे. त्याची तयारीही केली आहे. मात्र, मुदत संपल्याने अर्ज करता आला नाही. आता अर्ज करण्याची संधी मिळाली तर उत्तम हाेईल.

उन्मेष देशमुख, विद्यार्थी

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा