शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या!

By admin | Updated: August 28, 2015 01:16 IST

नापिकी व कर्जाचा डोंगर; गत महिनाभरात अकोला जिल्ह्यातील १६ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला.

अतुल जयस्वाल /अकोला: गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यासह जिल्हय़ातील बळीराजा हतबल झाला आहे. सततची नापिकी व डोक्यावर वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून गेलेले शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून, जिल्हय़ात गत महिनाभरात तब्बल १६ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली आहे. आकडेवारीच्या दृष्टीने दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव या महिनाभरात समोर आले आहे. जिल्हय़ातील शेती व्यवसाय हा मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जिल्हय़ात सिंचनाचा मोठा अनुशेष असल्याने शेतकर्‍यांना खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी पावसावरच अवलंबून राहावे लागते. गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्‍यांना मोठाच फटका बसला आहे. जिल्हय़ात गत तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांसाठी मारक ठरत आहे. वर्ष २0१२-१३ व २0१४-१५ मध्ये अतवृष्टीमुळे शेतकर्‍यांना चांगलेच जेरीस आणले. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी ही पिके तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सूर्यफुल, कांदा व फळबागांचे अतवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर गतवर्षी पावसाने दोन्ही हंगामात ह्यखोह्ण दिल्याने समाधानकारक पीक झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अशातच डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी वाढतच गेला. यावर्षीही पावसाने सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावल्यानंतर दीड महिन्याची दीर्घ दडी मारली. यामुळे पिके करपली व शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली आहे. यामुळे यावर्षीही पिकांची अवस्था ह्यजेमतेमह्ण असल्यामुळे शेतकर्‍यांचे मनोधैर्य ढळत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करतानाच डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा दूर करावा, या विवंचनेतूनच शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्हय़ातील १६ शेतकर्‍यांनी आत्महत्येचा पर्याय चोखाळून जीवनयात्रा संपविली आहे. यामध्ये जिल्हय़ातील सातही तालुक्यातील शेतकर्‍यांचा समावेश आहे.