शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या!

By admin | Updated: August 28, 2015 01:16 IST

नापिकी व कर्जाचा डोंगर; गत महिनाभरात अकोला जिल्ह्यातील १६ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला.

अतुल जयस्वाल /अकोला: गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यासह जिल्हय़ातील बळीराजा हतबल झाला आहे. सततची नापिकी व डोक्यावर वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून गेलेले शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून, जिल्हय़ात गत महिनाभरात तब्बल १६ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली आहे. आकडेवारीच्या दृष्टीने दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव या महिनाभरात समोर आले आहे. जिल्हय़ातील शेती व्यवसाय हा मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जिल्हय़ात सिंचनाचा मोठा अनुशेष असल्याने शेतकर्‍यांना खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी पावसावरच अवलंबून राहावे लागते. गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्‍यांना मोठाच फटका बसला आहे. जिल्हय़ात गत तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांसाठी मारक ठरत आहे. वर्ष २0१२-१३ व २0१४-१५ मध्ये अतवृष्टीमुळे शेतकर्‍यांना चांगलेच जेरीस आणले. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी ही पिके तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सूर्यफुल, कांदा व फळबागांचे अतवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर गतवर्षी पावसाने दोन्ही हंगामात ह्यखोह्ण दिल्याने समाधानकारक पीक झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अशातच डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी वाढतच गेला. यावर्षीही पावसाने सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावल्यानंतर दीड महिन्याची दीर्घ दडी मारली. यामुळे पिके करपली व शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली आहे. यामुळे यावर्षीही पिकांची अवस्था ह्यजेमतेमह्ण असल्यामुळे शेतकर्‍यांचे मनोधैर्य ढळत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करतानाच डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा दूर करावा, या विवंचनेतूनच शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्हय़ातील १६ शेतकर्‍यांनी आत्महत्येचा पर्याय चोखाळून जीवनयात्रा संपविली आहे. यामध्ये जिल्हय़ातील सातही तालुक्यातील शेतकर्‍यांचा समावेश आहे.