शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या!

By admin | Updated: August 28, 2015 01:16 IST

नापिकी व कर्जाचा डोंगर; गत महिनाभरात अकोला जिल्ह्यातील १६ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला.

अतुल जयस्वाल /अकोला: गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यासह जिल्हय़ातील बळीराजा हतबल झाला आहे. सततची नापिकी व डोक्यावर वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून गेलेले शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून, जिल्हय़ात गत महिनाभरात तब्बल १६ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली आहे. आकडेवारीच्या दृष्टीने दर दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव या महिनाभरात समोर आले आहे. जिल्हय़ातील शेती व्यवसाय हा मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जिल्हय़ात सिंचनाचा मोठा अनुशेष असल्याने शेतकर्‍यांना खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी पावसावरच अवलंबून राहावे लागते. गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्‍यांना मोठाच फटका बसला आहे. जिल्हय़ात गत तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांसाठी मारक ठरत आहे. वर्ष २0१२-१३ व २0१४-१५ मध्ये अतवृष्टीमुळे शेतकर्‍यांना चांगलेच जेरीस आणले. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी ही पिके तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सूर्यफुल, कांदा व फळबागांचे अतवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर गतवर्षी पावसाने दोन्ही हंगामात ह्यखोह्ण दिल्याने समाधानकारक पीक झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अशातच डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी वाढतच गेला. यावर्षीही पावसाने सुरुवातीला समाधानकारक हजेरी लावल्यानंतर दीड महिन्याची दीर्घ दडी मारली. यामुळे पिके करपली व शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली आहे. यामुळे यावर्षीही पिकांची अवस्था ह्यजेमतेमह्ण असल्यामुळे शेतकर्‍यांचे मनोधैर्य ढळत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करतानाच डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा दूर करावा, या विवंचनेतूनच शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्हय़ातील १६ शेतकर्‍यांनी आत्महत्येचा पर्याय चोखाळून जीवनयात्रा संपविली आहे. यामध्ये जिल्हय़ातील सातही तालुक्यातील शेतकर्‍यांचा समावेश आहे.