शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

गावातील प्रत्येक व्यक्ती विकसित, तरच गाव आदर्श

By admin | Updated: November 22, 2014 02:13 IST

ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण; संजय धोत्रेंनी केला केळीवेळीच्या विकासाचा संकल्प!

विवेक चांदूरकर / केशव सांगूनवेढेकेळीवेळी : गावातील रस्ते, नाल्या या भौतिक सुविधांसोबतच जर गावातील प्रत्येक माणूस, युवक व महिलांचा विकास झाला तरच खर्‍या अर्थाने गावाचा विकास झाला, असे म्हणता येईल. विचारात बदल झाला तरच माणूस बदलतो आणि मग त्यातून झालेली गावाची सुधारणा ही चिरकाल टिकून राहते. त्यामुळे गावातील लोकांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे हाच गाव आदर्श झाल्याचा पुरावा आहे, असे मत खासदार संजय धोत्रे यांनी मांडले. सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये केळीवेळी गावाची निवड झाल्यानंतर पहिलीच ग्रामसभा २१ नोव्हेंबर रोजी गावात पार पडली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे होते. रामसिंग राजपूत यांनी प्रास्ताविकातून केळीवेळी गावाचा इतिहास व स्वातंत्र्य लढय़ातील योगदानाची माहिती उपस्थितांसमोर मांडली. खा. धोत्रे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, केळीवेळी गावाची निवड ही विचारपूर्वक करण्यात आली. या गावातील लोकांमध्ये सत्कार्य करण्याची उर्मी आहे. विकास करण्याची जिद्द आहे. सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहतात. या गावातील अनेक लोकांना पाहिले, त्यांनी दिलेला लढा पाहिला. त्यांनी कधीच हार मानली नाही. आता गावकर्‍यांची जबाबदारी अधिकच वाढली. घाणच केली नाही तर साफसफाई करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आपल्याला या गावाचा असा विकास करायचा आहे की, केळीवेळीचे नाव संपूर्ण देशात जाईल व संपूर्ण देशातील लोक केळीवेळीला बघायला येतील, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली.