शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गावातील प्रत्येक व्यक्ती विकसित, तरच गाव आदर्श

By admin | Updated: November 22, 2014 02:13 IST

ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण; संजय धोत्रेंनी केला केळीवेळीच्या विकासाचा संकल्प!

विवेक चांदूरकर / केशव सांगूनवेढेकेळीवेळी : गावातील रस्ते, नाल्या या भौतिक सुविधांसोबतच जर गावातील प्रत्येक माणूस, युवक व महिलांचा विकास झाला तरच खर्‍या अर्थाने गावाचा विकास झाला, असे म्हणता येईल. विचारात बदल झाला तरच माणूस बदलतो आणि मग त्यातून झालेली गावाची सुधारणा ही चिरकाल टिकून राहते. त्यामुळे गावातील लोकांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे हाच गाव आदर्श झाल्याचा पुरावा आहे, असे मत खासदार संजय धोत्रे यांनी मांडले. सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये केळीवेळी गावाची निवड झाल्यानंतर पहिलीच ग्रामसभा २१ नोव्हेंबर रोजी गावात पार पडली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे होते. रामसिंग राजपूत यांनी प्रास्ताविकातून केळीवेळी गावाचा इतिहास व स्वातंत्र्य लढय़ातील योगदानाची माहिती उपस्थितांसमोर मांडली. खा. धोत्रे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, केळीवेळी गावाची निवड ही विचारपूर्वक करण्यात आली. या गावातील लोकांमध्ये सत्कार्य करण्याची उर्मी आहे. विकास करण्याची जिद्द आहे. सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहतात. या गावातील अनेक लोकांना पाहिले, त्यांनी दिलेला लढा पाहिला. त्यांनी कधीच हार मानली नाही. आता गावकर्‍यांची जबाबदारी अधिकच वाढली. घाणच केली नाही तर साफसफाई करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आपल्याला या गावाचा असा विकास करायचा आहे की, केळीवेळीचे नाव संपूर्ण देशात जाईल व संपूर्ण देशातील लोक केळीवेळीला बघायला येतील, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली.