शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

दर महिन्यात आमच्यातील दोघांचा जातो जीव; ७ महिन्यांत १४ वाघ दगावले

By atul.jaiswal | Updated: July 29, 2024 09:59 IST

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन विशेष 

अतुल जयस्वाल, लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला : राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असले, तरी चालू वर्षात जुलै महिन्यापर्यंत राज्यातील १४ वाघांचा मृत्यू विविध कारणांनी झाल्याची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)च्या संकेतस्थळावर आहे. यावरून राज्यात महिन्याला सरासरी दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

संवर्धनाचे प्रयत्न 

भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या वाघाला संरक्षण लाभले असून, वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. यानंतरही शिकार, नैसर्गिक मृत्यू, अपघात, आपसातील झुंजी आदी कारणांमुळे दरवर्षी वाघांचे मृत्यू होतात. देशभरात विविध कारणांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ठेवते.  

वाघांसाठी अभयारण्ये सुरक्षित

तीन वाघांचा मृत्यू (पेेंच- १, ताडोबा- २) अभयारण्याच्या हद्दीत झाला, तर उर्वरित ११ वाघ अभयारण्याबाहेर मृत्युमुखी पडल्याची नोंद ‘एनटीसीए’च्या संकेतस्थळावर आहे. 

जानेवारीत सर्वाधिक  मृत्यू

१४ वाघांपैकी पाच वाघ एकट्या जानेवारी महिन्यात दगावले. फेब्रुवारी महिन्यात दोन, मार्चमध्ये तीन, एप्रिलमध्ये एक, तर मे मध्ये तीन वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ