शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

अखेर गणेश विसर्जन स्थळ बदलले

By admin | Updated: September 8, 2014 01:14 IST

बाळापूरमधील समस्येच्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल

बाळापूर : शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे व गणेशभक्त येथील मन नदीत दरवर्षी गणेश मूर्तीचे विसर्जन करीत असलेल्या स्थळाची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णच्या शनिवार, ६ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित होताच त्या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन गणेश विसर्जनाचे दरवर्षीचे स्थळ बदलले आहे.मागील अनेक वर्षांंपासून बाळापूर येथील मन नदीत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीकाठी घाटच बांधलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळे व गणेशभक्त थेट नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन करतात. त्यामुळे गणेश मूर्ती विसर्जनाची परंपरागत जागा बदलवून नदीवर गणेश घाट बांधण्याची मागणी येथील गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी व गणेश भक्तांनी तालुका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन केली. यावर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडलेला नसल्यामुळे सध्याच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याच्या जागेवर कचरा व घाण साचली आहे. तेथे नागरिक शौचास बसतात. शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. तसेच शहरातील कचरादेखील नदीपात्रात टाकला जातो. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे अंगाला खाज सुटते. तसेच नदीपात्रातील पाणी खोल असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने सध्याच्या विसर्जनस्थळी यंदा गणेश विसर्जन करणार नसल्याचा इशारा येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी तालुका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त ह्यलोकमतह्णने शनिवार, ६ सप्टेंबरच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले होते. हे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये झळकताच गणेश भक्तांनी ते व्हॉटस अँपवर अपलोड करून मुख्यालयी न राहणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍याला पाठविले. ते वाचताच काही तासातच पोलिस स्टेशनला तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष मो.जमीर शे.इब्राहीम, ठाणेदार घनश्याम पाटील, न.प.मुख्याधिकारी एम.व्ही. आकोटकर यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत उपरोक्त ह्यश्री ह्ण विसर्जनाचे स्थळ बदलून यावर्षी गणेश घाट बांधण्याची मागणी गणेश मंडळ पदाधिकार्‍यांनी केली. परंतु, दोन दिवसांत गणेश घाट बांधणे शक्य नसल्याची चर्चा झाल्यानंतर गणेशमूर्ती विसर्जनाची तात्पुरती व्यवस्था म्हणून बाराधारी संस्थानसमोर मन नदीच्या पूर्वेकडील भागात ह्यश्री ह्ण विसर्जन करण्यासाठी तेथे दुरुस्ती करण्याचे आश्‍वासन न.प.मुख्याधिकारी आकोटकर यांनी दिले. गणेश भक्तांनी तेथे श्री विसर्जन करण्यास होकार दिला.या बैठकीनंतर सायंकाळी घनाबाई विद्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे, तहसीलदार समाधान सोळंके, नगराध्यक्ष मो.जमीर शे.इब्राहीम, मुख्याधिकारी आकोटकर, ठाणेदार पाटील आदींनी ह्यश्री ह्ण विसर्जन स्थळाचा मुद्दा निकाली काढण्यास प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल गणेश मंडळाचे आभार मानले. या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे यांनी शांतता राखणार्‍या मंडळांसाठी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस न.प.तर्फे १0 हजार रुपये, महसूल प्रशासनातर्फे दुसर्‍या क्रमांकाचे बक्षीस ७,५00 रुपये, पोलिस प्रशासनातर्फे तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये जाहीर करण्यात आले.