शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

प्रखर विरोधानंतरही वानचे पाणी पळविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST

तेल्हारा : वान धरणाचे पाणी तेल्हारा व अकोट तालुक्यातील जनतेला मिळत नाही. शेती सिंचनाखाली येत नाही. येथील जनतेचाच घसा ...

तेल्हारा : वान धरणाचे पाणी तेल्हारा व अकोट तालुक्यातील जनतेला मिळत नाही. शेती सिंचनाखाली येत नाही. येथील जनतेचाच घसा कोरडा असल्यावरही वानच्या पाण्याचे राजकारण आणि सत्तेचा वापर करून बाळापूरला पाणी पळविण्यात आले. आधी बटालियन कॅम्प आणि आता वानचे पाणी पळविण्यात आले. यावरून तालुक्यातील लोकप्रतिनिधींची शासन दरबारी काय किंमत आहे हे दिसून येते. प्रखर विरोध असताना, एक लोकप्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील पाणी पळवून नेतो आणि तालुक्यातील नेतेमंडळी बोटचेपी भूमिका घेतात. याविषयी जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.

बाळापूर येथे वानचे पाणी नेल्यास स्थानिक शेतकऱ्यांना सिंचन किंवा पिण्याचे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तालुक्यात धरण असूनही येथील जनतेचा घसा कोरडा आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील वानचे पाणी दुसऱ्या मतदारसंघात जाऊ नये. यासाठी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पाठपुरावा करून आंदोलन केले. निवेदन दिले. बाळापूरसह अकोला येथील अमृत योजनेकरिता झालेले पाणी आरक्षण रद्द करण्यासाठी प्रखर विरोध होत असताना पालकमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा वानचे पाणी तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही, असे आश्वासनच नव्हेतर कार्यकारी अभियंत्यांना नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतरही बाळापूर पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला. अकोट व तेल्हारा तालुक्यातील १५९ गावांचा प्रस्ताव हा त्रुटीअभावी परत पाठविला. वान प्रकल्पात पाणी शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून हा प्रस्ताव थंडबस्त्यात टाकण्यात आला आणि बाळापूर पाणीपुरवठ्याला मात्र, थेट मंत्रालयातून मंजुरी मिळते. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. बाळापूरला पाणी गेल्यास तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर होणार असल्याचे चिन्हे आता दिसू लागली आहेत. त्यामुळे बाळापूरच्या पाणीपुरवठा प्रस्तावाला स्थगिती देण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नेते किती ताकद लावतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आता रस्त्यावर उतरण्याची तयारी हवी !

तालुक्यातील पाणी इतरत्र जाऊ नये. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करून निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र त्याचे काही फलित झाले नाही. त्यामुळे वानचे पाणी रोखण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची मानसिकता हवी. नावापुरता विरोध न करता, जनतेनेही त्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असा विचार वान प्रकल्प आंदोलन समिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहेे.

तेल्हारा तालुक्यातील वानचे पाणी बाळापूरला पळवून नेणे हा येथील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्याय आहे. बाळापूर पाणीपुरवठ्याला स्थगिती मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांच्यासोबत चर्चा येत्या अधिवेशनात शासनाला निर्णय घेण्यास बाध्य करेल.

अमोल मिटकरी, आमदार विधान परिषद

शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्यामध्ये कपात होणार नाही. मी सध्या दिल्ली येथील शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असून, परत आल्यानंतर जनता व शेतकरी यांच्या हितासाठी प्रयत्न करणार.

बच्चू कडू, पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री

यापूर्वीच शासनाला पत्र देऊन माझ्या मतदारसंघातील प्रकल्पाचे पाणी देण्यास विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडीने शासनाने पाण्याचे राजकारण करून स्थानिक शेतकरी व जनतेवर अन्याय केला. जनतेला विश्वासात घेऊन शासनाने निर्णय घ्यावा.

प्रकाश भारसाकळे, आमदार, अकोट मतदारसंघ

तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. जनतेसाठी लढा देऊ. परंतु धरणातील पाणी इतरत्र जाऊ देणार नाही.

विजय मोहोड, तालुकाप्रमुख, शिवसेना, तेल्हारा

बाळापूर तालुक्यात नद्या, पाणीसाठा मुबलक असताना, वानचे पाणी पळवून नेण्यामागे काय प्रयोजन आहे. तेल्हारा तालुक्यातील जनतेलाच पाणी मिळत नाही. अशा बाळापुरला पाणी हा अन्याय आहे. या निर्णयाविरोधात पाठपुरावा करू.

डॉ. संजीवनी बिहाडे, प्रदेश उपाध्यक्ष, महिला काँग्रेस