शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रखर विरोधानंतरही वानचे पाणी पळविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST

तेल्हारा : वान धरणाचे पाणी तेल्हारा व अकोट तालुक्यातील जनतेला मिळत नाही. शेती सिंचनाखाली येत नाही. येथील जनतेचाच घसा ...

तेल्हारा : वान धरणाचे पाणी तेल्हारा व अकोट तालुक्यातील जनतेला मिळत नाही. शेती सिंचनाखाली येत नाही. येथील जनतेचाच घसा कोरडा असल्यावरही वानच्या पाण्याचे राजकारण आणि सत्तेचा वापर करून बाळापूरला पाणी पळविण्यात आले. आधी बटालियन कॅम्प आणि आता वानचे पाणी पळविण्यात आले. यावरून तालुक्यातील लोकप्रतिनिधींची शासन दरबारी काय किंमत आहे हे दिसून येते. प्रखर विरोध असताना, एक लोकप्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील पाणी पळवून नेतो आणि तालुक्यातील नेतेमंडळी बोटचेपी भूमिका घेतात. याविषयी जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.

बाळापूर येथे वानचे पाणी नेल्यास स्थानिक शेतकऱ्यांना सिंचन किंवा पिण्याचे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तालुक्यात धरण असूनही येथील जनतेचा घसा कोरडा आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील वानचे पाणी दुसऱ्या मतदारसंघात जाऊ नये. यासाठी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे पाठपुरावा करून आंदोलन केले. निवेदन दिले. बाळापूरसह अकोला येथील अमृत योजनेकरिता झालेले पाणी आरक्षण रद्द करण्यासाठी प्रखर विरोध होत असताना पालकमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा वानचे पाणी तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही, असे आश्वासनच नव्हेतर कार्यकारी अभियंत्यांना नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतरही बाळापूर पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला. अकोट व तेल्हारा तालुक्यातील १५९ गावांचा प्रस्ताव हा त्रुटीअभावी परत पाठविला. वान प्रकल्पात पाणी शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून हा प्रस्ताव थंडबस्त्यात टाकण्यात आला आणि बाळापूर पाणीपुरवठ्याला मात्र, थेट मंत्रालयातून मंजुरी मिळते. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. बाळापूरला पाणी गेल्यास तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर होणार असल्याचे चिन्हे आता दिसू लागली आहेत. त्यामुळे बाळापूरच्या पाणीपुरवठा प्रस्तावाला स्थगिती देण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, नेते किती ताकद लावतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आता रस्त्यावर उतरण्याची तयारी हवी !

तालुक्यातील पाणी इतरत्र जाऊ नये. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करून निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र त्याचे काही फलित झाले नाही. त्यामुळे वानचे पाणी रोखण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची मानसिकता हवी. नावापुरता विरोध न करता, जनतेनेही त्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असा विचार वान प्रकल्प आंदोलन समिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहेे.

तेल्हारा तालुक्यातील वानचे पाणी बाळापूरला पळवून नेणे हा येथील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्याय आहे. बाळापूर पाणीपुरवठ्याला स्थगिती मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांच्यासोबत चर्चा येत्या अधिवेशनात शासनाला निर्णय घेण्यास बाध्य करेल.

अमोल मिटकरी, आमदार विधान परिषद

शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्यामध्ये कपात होणार नाही. मी सध्या दिल्ली येथील शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असून, परत आल्यानंतर जनता व शेतकरी यांच्या हितासाठी प्रयत्न करणार.

बच्चू कडू, पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री

यापूर्वीच शासनाला पत्र देऊन माझ्या मतदारसंघातील प्रकल्पाचे पाणी देण्यास विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडीने शासनाने पाण्याचे राजकारण करून स्थानिक शेतकरी व जनतेवर अन्याय केला. जनतेला विश्वासात घेऊन शासनाने निर्णय घ्यावा.

प्रकाश भारसाकळे, आमदार, अकोट मतदारसंघ

तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. जनतेसाठी लढा देऊ. परंतु धरणातील पाणी इतरत्र जाऊ देणार नाही.

विजय मोहोड, तालुकाप्रमुख, शिवसेना, तेल्हारा

बाळापूर तालुक्यात नद्या, पाणीसाठा मुबलक असताना, वानचे पाणी पळवून नेण्यामागे काय प्रयोजन आहे. तेल्हारा तालुक्यातील जनतेलाच पाणी मिळत नाही. अशा बाळापुरला पाणी हा अन्याय आहे. या निर्णयाविरोधात पाठपुरावा करू.

डॉ. संजीवनी बिहाडे, प्रदेश उपाध्यक्ष, महिला काँग्रेस