शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

आंबे पिकविण्यासाठी इथिलीन स्प्रे, चायनीज पावडरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:19 IST

आंबे पिकविण्यासाठी जिल्ह्यात अत्यंत घातक असलेल्या इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फळांचा राजा असलेला तसेच उन्हाळ्यात प्रत्येक व्यक्ती मोठ्या चवीने खात असलेले आंबे पिकविण्यासाठी जिल्ह्यात अत्यंत घातक असलेल्या इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १०० पार्ट पर मिलीयन यापेक्षा जास्त इथिलीनचा वापर करण्यास प्रतिबंध असताना याचा यापेक्षा अधिक प्रमाणात वापर होत असल्याने कच्ची कैरी २४ तासाच्या आतच पिकलेला आंबा बनत असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्ह्यात आंब्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने ही तुट भरुन काढण्यासाठी कच्च्या कैरीचे तातडीने आंबे तयार करण्यात येत आहेत. यासाठी घातक इथिलीन स्प्रे, चायनीज पावडर या दोन रसायनांचा वापर होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. इथिलीन स्प्रे हा आंबे पिकविण्यासाठी वैध असल्याचे व तशी परवानगी असल्याचे आंबे विकणाऱ्या ठोक व्यावसायिकांचे म्हणणे आहे; मात्र या इथिलीन स्प्रेचा आणि चायनीज पावडरचा १०० पार्ट पर मिलियन (पीपीएम) यापेक्षा अधिक प्रमाणात वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत; मात्र आंबे पिकविण्यासाठी आणि व्यापाऱ्यांनी इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पहिल्या दिवशी आलेले कच्चे आंबे दुसºयाच दिवशी पिकविण्याचा अजब गजब फंडा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी कॅल्शियम कार्बोइटने आंबे पिकविण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू होता; मात्र यावर राज्यभरात छापेमारी झाल्यानंतर व्यापाºयांनी आंबे झटपट पिकविण्यासाठी दुसरा पर्याय शोधून काढला असून, इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा वापर करून काही तासातच आंबे पिकविण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आंब्याच्या एका कॅरेटमध्ये पुडित बांधलेली चायनीज पावडर टाकल्यानंतर चोवीस तासाच्या आतच आंबा पिकत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.काय आहे इथिलीन स्प्रेच्इथिलीन हा एक हायड्रोकार्बन वायू आहे. सफरचंद आणि इतर काही फळे असे आहेत जे इथिलीन तयार करतात. आंबे पिकविण्याकरितासुद्धा कृत्रिमरीत्या तयार केलेल्या इथिलीन लिक्विड किंवा पावडरचा वापर केला जातो. त्याचा वापर १०० पीपीएमपेक्षा जास्त झाल्यास मानवी शरीरास धोकादायक असल्याची माहिती आहे.

कॅल्शियम कार्बाइड आहे घातकच्कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस हे दोन गुणधर्म असू शकतात. हे दोन्ही शरीरासाठी प्रचंड घातक आहेत. म्हणून बहुतेक देशांमध्ये फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडवर प्रतिबंध घालण्यात आले आहे; मात्र तरीदेखील महाराष्ट्रात फळे पिकविण्यासाठी तसेच आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत असल्याची माहिती सूत्रानी दिली.

कॅल्शियम कार्बाइड किंवा इथिलीन स्प्रेचा वापर करून आंबे पिकविण्यात येत असतील तर त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा व्यापाºयांवर नजर ठेवण्यात येत आहे; मात्र ही सर्व प्रक्रिया अकोला जिल्ह्याबाहेर असलेल्या काही ठिकाणच्या गोदामांवर होत असल्याची माहिती आहे, तसेच हे गोदाम वारंवार बदलण्यात येत असल्याची माहिती आहे. माहिती मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.-रावसाहेब वाकडेअन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMangoआंबा