शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

सकल संतांच्या ग्रंथांचा सार म्हणजे ग्रामगीता!

By admin | Updated: December 25, 2016 02:41 IST

ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे यांचे प्रतिपादन

अकोला, दि. २४- संतांनी मांडलेले विचार हे जीवनात परिवर्तन घडविणारे असतात. सर्व संतांनी मांडलेले विचार गं्रथ स्वरूपात उपलब्ध आहेत. ते आचरणात आणले पाहिजे. सकल संतांनी निर्माण केलेल्या गं्रथांचा सार म्हणजे ग्रामगीता असून, यामध्ये समाजातील सर्व समस्यांचे समाधान आहे, असे प्रतिपादन अंजनगाव सूर्जी येथील ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे यांनी शनिवारी येथे केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलातर्फे स्वराज्य भवन प्रांगणात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी ग्रामगीतेवर व्याख्यान देताना ते बोलत होते. राष्ट्रसंतांना वंदन करून त्यांनी ग्रामगीतेवरील व्याख्यानाला सुरुवात केली. मनोहरदादा रेचे यांनी आपल्या व्याख्यानादरम्यान विविध दाखले देऊन ग्रामगीतेची आजच्या काळातील उपयुक्तता पटवून सांगितली. वंदनीय तुकडोजी महाराजांनी सहज समजेल, अशा भाषेत तत्त्वज्ञान सांगितले. तत्त्वज्ञानाला अध्यात्माची जोड असेल, तरच ते समाजाच्या पचनी पडते. राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाला अध्यात्माची जोड आहे, म्हणूनच ग्रामगीता जनसामान्यांना आपली वाटते. ग्रामगीतेला अध्यात्माची जोड आहे. ग्रामगीतेमध्ये जगाच्या कल्याणाचा विचार मांडलेला आहे. ग्रामगीतेमध्ये ज्याला जे जे हवे, ते ते उपलब्ध आहे. जनसामान्यांच्या, शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांची उकल ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी केली आहे. संत सहज बोलले तरी तो हितोपदेश ठरतो. संत कधीही बाष्कळ चर्चा करीत नाहीत. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत समाजातील सर्वच घटकांचा विचार केला आहे. भागवत गीतेचे सक्रिय स्वरूप म्हणजे ग्रामगीता आहे, असे विचार मनोहरदादा रेचे यांनी मांडले. ग्रामगीता ताठ मानेने जगायला शिकविते!ज्याला स्वत:चा परिचय झाला, स्वत:चा आत्मा कळला, तोच इतरांचे कल्याण करू शकतो. ज्याला स्वत:चाच परिचय झाला नाही, तो इतरांसाठी काहीही करू शकत नाही. ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी स्वत:ला ओळखण्याचा सल्ला दिला आहे. ग्रामगीता हताश, निराश झालेल्या समाजाला नवसंजीवनी देणारी आहे. हतबल झालेल्या व्यक्तीला ग्रामगीता ताठ मानेने जगणे शिकविते, असे विवेचन रेचे यांनी केले.