शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नवे शैक्षणिक सत्र सुरू करून ऑनलाइन शिक्षणावर भर - प्रकाश मुकुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 17:17 IST

शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद...

- नितीन गव्हाळे

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला  : कोरोना प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्र सुरू करावे की नाही, याविषयी चर्चा सुरू होती. अखेर शासनाने काही नियम व अटी घालून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास सांगितले आहे; परंतु परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्यावर अधिक भर आहे. शिक्षकांच्या कामाबाबत, शैक्षणिक सत्राबाबत नियोजन करण्यात येत आहे. असे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी मुकुंद यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद... 

ऑनलाइन शिक्षणाबाबत काय नियोजन केले आहे?- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेमार्फत दीक्षा अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आणि रेडिओ, टीव्हीद्वारे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑफलाइनपेक्षा आॅनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्यावर शिक्षण विभागाचा भर राहणार आहे. यात आव्हाने आहेत; परंतु त्यावर मात करून मुलांना शिक्षण कसे मिळेल, याचा विचार आम्ही करतो आहोत.शाळा सुरू करण्याच्या नियोजनाबाबत काय सांगाल?- शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्याची परिस्थिती पाहून, टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होतील. त्यासाठी शाळा विकास समिती, शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार दिले आहेत. एकदम शाळा सुरू होणार नाहीत; परंतु शाळांच्या शैक्षणिक सत्रास सुरुवात करणे गरजेचे आहे. इ. ९ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण जुलैपासून, इ. ६ वी ते ८ वी-आॅगस्टपासून, इ. ३ री ते ५ वी-सप्टेंबरपासून आणि इ. ११ वीचे शैक्षणिक दहावीच्या निकालानंतर सुरू करण्यात येईल. सध्या फिजिकली शैक्षणिक सत्रात सुरू करणे शक्य नाही; परंतु आॅनलाइन शैक्षणिक सत्रास सुरुवात झाली आहे.शिक्षकांचे काम, त्यांच्या समस्यांचे काय?- जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्था कायद्यांतर्गत जिल्ह्यातील १,३00 माध्यमिक शिक्षकांच्या शासकीय कामासाठी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. आॅनलाइन शिक्षण सांभाळून शिक्षक राष्ट्रीय कार्यात योगदान देत आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण विभाग तत्पर आहे. शिक्षणाधिकारी कार्यालय सुरू असून, शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील.

खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कावरील नियंत्रणाचे काय?- शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. खासगी शाळांनी यंदा शैक्षणिक शुल्क वाढ करू नये. पालकांकडून टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्क आणि तेही ऑनलाइन घ्यावे. शाळांनी शुल्कवाढ केल्याची पालकांनी तक्रार केल्यास त्या शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार समिती स्थापन करण्यात आली आहे.

संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक, त्यांचे समायोजनाचे काय?- यंदा संचमान्यता होणार नाही. संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक, त्यांचे समायोजन हे विषय तूर्तास बाजूला आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, याला प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे सध्या तरी ऑफलाइनपेक्षा आॅनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल, याच्यावरच शिक्षण विभाग भर देत आहेत. ग्रामीण भागात अडचणी येत आहेत; परंतु त्या कशा दूर करता येतील, याचाही विचार आम्ही करतो आहोत. शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबत नियोजन करावे.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रinterviewमुलाखत