शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

निर्यातक्षम शेतमाल उत्पादनावर भर; उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:03 IST

गटशेती करण्यासाठी गटशेतीची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.

अकोला : पश्चिम विदर्भात २५० वर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, या माध्यमातून गटशेती करण्यासाठी गटशेतीची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. त्याकरिता गटशेतीच्या अनुदानात ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घ्यावे, याकडेही लक्ष देण्यात येत आहे.शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण करण्यासाठी सूक्ष्म मार्गदर्शन करण्यावर कृषी विभागाने भर दिला आहे. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आता ६० टक्के असे भरीव अनुदान देण्यात येणार आहे. वºहाडात २५० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यातील काही कंपन्या चांगले काम करीत आहेत. त्यामध्ये ९८ कंपन्यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील नरनाळा शेतकरी उत्पादक कंपनीचे काम जोरात आहे. अकोट तालुक्यातून केळी व भाजीपाला ही पिके परदेशात निर्यात केली जात आहेत. अकोला जिल्ह्यातून केळी व काही भाजीपाला पिके निर्यात केली जात आहेत. त्यामुळे इतर कंपन्यांना प्रोत्साहन देऊन येथील शेतमाल देशात तसेच परदेशात कसा पाठविता येईल, यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत मुख्यत्वे कापूस, सोयाबीन व तूर ही पिके सर्वाधिक घेतली जात आहेत. शेतकºयांनी या पारंपरिक पिकांसह जे बाजारात विकले जाते, ते शाश्वत पीक घेण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सेंद्रिय, जैविक उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.कांदा, ओवा इतर मसाले पिकांसह रेशीम शेतीसह सुगंधी औषधी वनस्पतीचीदेखील शेतकºयांनी लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन कृषी विभागासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात येत आहे.

गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. गटशेती करू न शेतकºयांनी शाश्वत उत्पादन घेण्यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. निर्यातक्षम शेतमाल तयार करावा, यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत.- मोहन वाघ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र