शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

‘हीरक महोत्सवी’ अभियानात स्वच्छता, सौंदर्यीकरणावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 15:44 IST

मनपाकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ असल्याने स्वच्छतेची कामे सहज निकाली निघणे शक्य होणार आहे.

अकोला: ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी नगर विकास विभागाने १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात ‘हीरक महोत्सवी अभियान’राबविण्याचे निर्देश जारी केले. या अभियान अंतर्गत शहरातील स्वच्छता व सौंदर्यीकरणावर भर देण्यात आल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत स्वच्छतेच्या कामासाठी मनपाकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ असल्याने स्वच्छतेची कामे सहज निकाली निघणे शक्य होणार आहे. यासाठी प्रशासनाचे नियोजन व कर्मचाºयांच्या इच्छाशक्तीची गरज असून, यानिमित्ताने प्रशासनाची कार्यक्षमता दिसून येणार आहे.१ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत महापालिका क्षेत्रात ‘हीरक महोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या अभियानात घनकचºयासोबतच बांधकाम आणि पाडकाम कचºयाचीही विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. ३० एप्रिलपर्यंत राबविल्या जाणाºया अभियानात रस्त्यांच्या दुरुस्तीचाही समावेश करण्यात आला आहे. स्वच्छता व सौंदर्यीकरणावर विशेष भर देण्यात आला असून, सदर कामासाठी मनपा प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात कर्मचाºयांचे संख्याबळ उपलब्ध आहे. त्या पृष्ठभूमिवर मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून प्रत्यक्षात कोणत्या उपाययोजना राबविल्या जातात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.स्वच्छता विभागाची परीक्षामनपाच्या स्वच्छता विभागात साफसफाईसाठी आस्थापनेवर ७४८ सफाई कर्मचारी आहेत. यापैकी काही कर्मचारी विविध विभागांच्या बिळात दडून बसले आहेत. ११ पेक्षा जास्त पडीत प्रभागांमध्ये ६१६ पेक्षा अधिक खासगी कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर देखरेखीसाठी आरोग्य निरीक्षकांची फौज आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जमा होणारा कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर साठवला जात असल्याने सफाई कर्मचाºयांवरील कामाचा ताण कमी झाला आहे. अर्थातच, सदर अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता विभागाची परीक्षा दिसून येईल.रस्त्यांलगत मातीचे ढीग!संपूर्ण शहरात उघड्यावर मातीचे ढीग आहेत. ज्या ठिकाणी विकास कामे सुरू नाहीत, त्याठिकाणीसुद्धा माती, धूळ व कचरा साचल्याचे चित्र आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, रस्त्यांच्या दुभाजकालगत मातीचे ढीग आहेत. धुळीमुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात आले असताना स्वच्छता विभागाचे आरोग्य निरीक्षक कोणते कर्तव्य निभावत आहेत,असा सवाल उपस्थित होतो. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका