शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विजेच्या तुटवड्यामुळे आपत्कालीन भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 19:19 IST

गत दोन दिवसांपासून महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याने दोन ते तीन तास वीज पुरवठा बंद राहत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

उकाड्याने नागरिक हैरान : वीजेची मागणी वाढलीअकोला : उन्हाळय़ात वाढलेली वीजेची मागणी पुर्ण करताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत असून, विजेच्या तुटवड्यामुळे जिल्हय़ात महावितरणकडून सर्वच फिडरवर सातत्याने आपत्कालिन भारनियमन करावे लागत आहे. गत दोन दिवसांपासून महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याने दोन ते तीन तास वीज पुरवठा बंद राहत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. विजेची वाढती मागणी व प्रत्यक्ष पुरवठा यामधील तफावत वाढत असल्याने गत काही दिवसांपासून महावितरणकडून आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी महावितरणकडून विविध ग्रुपवर आपत्कालीन भारनियमन करण्यात आले. तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना होणार्‍या या भारनियमनामुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. शनिवारी भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार, ई, एफ, जी १, जी २, जी ३ या ग्रुपवर टप्प्या-टप्प्याने भारनियमन करण्यात आले. यामुळे विविध फिडरवरील वीज पुरवठा दोन ते तीन तास खंडित होता. सध्या उन्हाचा कडाका वाढला असताना नागरिकांकडून विजेच्या उपकरणांचा वापर वाढला आहे. गारवा देणारे कुलर, एसी, पंखे आदी उपकरणे बंद राहिल्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, सायंकाळी सर्वच ग्रुपवरील भारनियमन मागे घेण्यात आले.पाणीपुरवठा विस्कळितसद्या जिल्हय़ात सर्वत्र पाणीटंचाईचे चित्र आहे. ग्रामीण भागात आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एक वेळ असा पाणीपुरवठा केला जात आहे. भारनियमनामुळे काही गावांमध्ये योगायोगाने पाणीपुरवठय़ाच्या दिवशीच वीज गुल होते. त्यामुळे त्या गावात त्या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकत नाही.