शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:48 IST

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे.

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने महावितरणच्या कामकाजावर अकोलेकरांसह मनपा प्रशासनाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात मनपाकडून महावितरण कंपनीला पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती आहे.यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे महान धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. साहजिकच, सिंचनासाठी विजेचा वापर वाढला असून, त्याचा परिणाम महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर होत असल्याचे समोर आले आहे. सिंचनासाठी विजेचा वापर वाढल्यामुळे जलशुद्धीक रण केंद्रावरील विद्युत दाब कमी होत आहे. यामुळे पाण्याचा उपसा करणारे पंप वेळोवेळी बंद करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर एक्स्प्रेस फिडर असतानाही वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे मागील काही दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद करावा लागत आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असतानाही ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे अकोलेकरांमध्ये महावितरण कंपनीप्रती तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. या प्रकाराची दखल घेत मनपा प्रशासनाकडून महावितरण पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती आहे.दाब कमी; उपशावर परिणामजलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी आणि २५ एमएलडीचे दोन प्लान्ट कार्यान्वित आहेत. ६५ एमएलडीच्या प्लान्टवर पाण्याचा उपसा करण्यासाठी पाच पंप असून, त्यापैकी तीन पंपांद्वारे उपसा केला जातो. २५ एमएलडीच्या प्लान्टवर दोन पंप असून, त्यापैकी एका पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. सकाळी ८ ते सायंकाळी ४ हा कालावधी पाण्याच्या उपशाकरिता महत्त्वाचा आहे. नेमका याच कालावधीत जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत दाब कमी होत असल्याने मनपाला नाइलाजाने एका पंपाद्वारे पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण