शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

सहकारी संस्थांच्या निवडणुकाही आचारसंहितेच्या कक्षेत

By admin | Updated: November 15, 2014 23:57 IST

पारदर्शक व भयमुक्त निवडणुकीचा प्रयास.

नागेश घोपे/वाशिम राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नवी आचारसंहिता लागू केली आहे. लोकसभा, विधानसभा तथा स् थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेच्या धर्तीवर ही आचारसंहिता राहणार आहे. उमेदवारांच्या अफाट खर्चावर अंकुश ठेवण्यासह निवडणूक पारदर्शक, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा तथा विधानसभेच्या निवडणूकांसाठी निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येत असते. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यापासून तर निवडणुका पारदर्शक व भयमुक् त वातावरणात पार पाडण्यात आचारसंहिता महत्वपूर्ण ठरते. सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र, उमेदवारांवर अंकुश ठेवणारी कोणतीही आचारसंहिता नसल्याने उमेदवार व संबधित पॅनलवर कुणाचेही नियंत्रण राहत नाही. यातूनच अव्वाच्या सव्वा खर्च करणे, मतदारांना आमिष देणे आदी विविध प्रकार घडतात. उमेदवार तथा पॅनलच्या या बेबंदशाहीला आळा घालण्यासाठी लोकसभा, विधानसभा तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. यामध्ये सहकारी संस्थांची निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवार अथवा पॅनलला १६ प्रकारच्या आचारसंहितेला बांधिल रहावे लागणार आहे. नव्या आचारसंहितेनुसार उमेदवारांच्या खर्चावर निबर्ंध घालण्यात आले आहेत. उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केल्यापासून, तर म तदान संपेपर्यंंत केलेल्या सर्व खर्चाचा हिशेब निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावा लागणार आहे. पॅनलने संयुक्तपणे केलेला खर्च उमेदवारांमध्ये विभागून त्याचाही हिशेब द्यावा लागणार आहे. हिशेब न देणार्‍या उमेदवारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी, सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद होईल. या काळात कोणतेही नवे निर्णय घेण्यास बंदी असेल; मात्र जुन्या योजना, कामे सुरू ठेवता येतील. संस्थांच्या नोकरदारांनी कोण त्याही स्थितीत निवडणूक प्रचारात किंवा पॅनेलच्या कामात सहभागी होऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सहकारी संस्थेच्या निवडणूका पारदर्शक व्हाव्या, यासाठी राज्य सहकारी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले याबाबतचे एक परिपत्रक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले असून, यानंतर जिल्ह्यात होणार्‍या प्र त्येक सहकारी संस्थेच्या निवडणूकीत ही आचारसंहिता लागु करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी सांगीतले.