शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

अनाथालय मुक्त भारत बनविण्यासाठी प्रयत्न! - श्रेया भारतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 13:03 IST

अनाथालयमुक्त भारत बनविण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन देशभर कार्य करणार आहे. असे स्वनाथ फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ़श्रेया श्रीकांत भारतीय यांनी सांगितले.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशामध्ये दोन कोटी अनाथ मुले आहेत. ही मुले अनाथ म्हणून नव्हेतर स्वनाथ म्हणून जगावी. त्यांना त्यांचे अधिकार, हक्क मिळावेत. त्यांना कुटूंब मिळावेत. सध्या देशात ४१00 मुलांना दत्तक विधान करून कुटूंब मिळाले आहे. अनाथमुक्त, अनाथालयमुक्त भारत बनविण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन देशभर कार्य करणार आहे. असे स्वनाथ फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ़श्रेया श्रीकांत भारतीय यांनी शनिवारी सांगितले. अनाथ मुलांच्या पुर्नवसनासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

 स्वनाथ फाऊंडेशनच्या स्थापनेमागील उद्देश काय? - स्वनाथ फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असून, तिची स्थापन जून २0१९ मध्ये झाली. अनाथ मुलांना स्वनाथ बनवून त्यांना हक्काची कुटूंब मिळवून देणे, त्यांचे अधिकार, त्यांच्या हक्कांचे संरक्षण यासाठी स्वनाथने कार्य हाती घेतले आहे. समाजाचे पाठबळ मिळाले तर अनाथ स्वनाथ बनतील.  

अनाथ मुलांचे पुर्नवसन कसे करणार?  - देशात, राज्यात अनेक मुले अनाथ आहेत. अशा प्रत्येक अनाथ मुला-मुलींना कुटूंब मिळवून द्यावे. त्यांना कुटूंब मिळाले तर त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक विकास होईल. अनाथ हे अनाथ न राहता, स्वनाथ बनावे. स्वनाथ म्हणजे, मी माझाच नाथ ही आमची संकल्पना आहे. 

अनाथ मुलांना कुटूंब मिळवून देण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत.? - गणेशोत्सवामध्ये गणपतीला घरी आणतो. दहा दिवस मनोभावे पुजतो. त्याऐवजी अनाथ मुलाला घरी आणले, त्याला न्हाऊमाखू घातले तर गणेशाच्या पूजनाचे पुण्य लाभेल. अशा पद्धतीने आम्ही येत्या गणेशोत्सवामध्ये १00 अनाथ मुलांना काही कुटूंबांच्या घरी पाठविणार आहोत. त्यासाठी सहृदयी कुटूंबांनी पुढे यावे. यातूनच कुटूंबांची इच्छा मुलांना दत्तक घेण्याची झाल्यास, त्यांना प्रवृत्त करणे, अकोल्यात गायत्री शिशूगृह, उत्कृर्ष अनाथालयाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

 - अनाथालये असताना, कुटूंब पालकत्व कसे स्विकारणार ? सध्या सामाजिक संस्थांचे बाजारीकरण झाले आहे. अनाथालय हे अनाथ मुलांसाठी तात्पुरती व्यवस्था आहेत. यातून त्यांचा शारिरीक, भावनिक विकास होत नाही. अनेकदा येथील मुले वाममार्गाला लागली आहेत. त्यांना अत्याचाराला बळी पडली आहेत. अनाथमुक्त आणि अनाथालयमुक्त भारतासाठी कुटूंब व्यवस्थेत अनाथ मुले गेली पाहिजे. त्यांचे पालकत्व स्विकारण्यासाठी सहृदयी कुटूंबांनी पुढे यावे.  यासाठी स्वनाथ फाऊंडेशन काम करीत आहेत. त्याला समाजाचे पाठबळ सुद्धा मिळत आहे. अनाथ मुले ही स्वनाथ बनावी. हेच आमचे ध्येय आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत