शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:25 IST

जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काही वर्षांपूर्वी शेती व्यवसाय श्रेष्ठ समजला जात होता. व्यापार मध्यम आणि नोकरी  कनिष्ठ अशी परिस्थिती होती; परंतु आता उलट झाले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. शेतीला  पूरक व्यवस्था उभी झाली नाही. सिंचनाची व्यवस्था झाली नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सा पडला; परंतु आता जिल्हय़ातील सिंचनाच्या प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्षभरामध्ये  शेतकर्‍यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असे सांगत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शे तकर्‍यांनी शेतीसोबतच जोडधंद्यांकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले आणि जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला सोमवारी दुपारी त्यांनी सदिच्छा भेट  दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत भाजपच्या विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अँड. मो तीसिंह मोहता, भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी,  शरद झांबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अँड. मोतीसिंह मोहता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील, शिवाजी म्हैसने, डॉ.  गजानन काकड, उज्ज्वल ठाकरे, प्रकाश कळंब, शिवराव राखोंडे, मधुकर सरप, राजू महल्ले,  कैलास शहापूरकर, सुरेश राऊत, श्रीकृष्ण बिल्लेवार, श्रीकृष्ण माळी, नीलेश मरकाडे यांनी  मान्यवरांचे स्वागत केले. 

ज्येष्ठ शेतकर्‍यांना पेन्शन लागू करावी - सिरस्कारबाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी  कार्यक्रमाला सोमवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी हिताचा  विचार होणे गरजेचे आहे; परंतु शासन शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी संपला पाहिजे.  या दृष्टिकोनातूत कृषीविषयक धोरणे राबविली जात आहेत. शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या शेतीचा  विकास झाला पाहिजे, यासाठी काम करण्याची गरज आहे. शासकीय कर्मचार्‍यांना सेवानवृत्तीनंतर  पेन्शन मिळते, तशीच पेन्शन आमच्या ज्येष्ठ शेतकर्‍यांसाठी लागू झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे  गरजेचे आहे, असे मत आमदार बळीराम सिरस्कार यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांचे संघटन मजबूत व्हावे - मसनेधर्मादाय आयुक्त के.व्ही. मसने यांनी बोलताना शेतकरी जाती-धर्मात विभागल्या गेला आहे. यातून  बाहेर पडून शेतकर्‍यांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. शेतकर्‍याला स्वावलंबी  बनविण्यासाठी ध्येय-धोरणे राबविण्याची गरज आहे, असे मत मांडले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटील