शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:25 IST

जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काही वर्षांपूर्वी शेती व्यवसाय श्रेष्ठ समजला जात होता. व्यापार मध्यम आणि नोकरी  कनिष्ठ अशी परिस्थिती होती; परंतु आता उलट झाले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. शेतीला  पूरक व्यवस्था उभी झाली नाही. सिंचनाची व्यवस्था झाली नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सा पडला; परंतु आता जिल्हय़ातील सिंचनाच्या प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्षभरामध्ये  शेतकर्‍यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असे सांगत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शे तकर्‍यांनी शेतीसोबतच जोडधंद्यांकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले आणि जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला सोमवारी दुपारी त्यांनी सदिच्छा भेट  दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत भाजपच्या विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अँड. मो तीसिंह मोहता, भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी,  शरद झांबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अँड. मोतीसिंह मोहता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील, शिवाजी म्हैसने, डॉ.  गजानन काकड, उज्ज्वल ठाकरे, प्रकाश कळंब, शिवराव राखोंडे, मधुकर सरप, राजू महल्ले,  कैलास शहापूरकर, सुरेश राऊत, श्रीकृष्ण बिल्लेवार, श्रीकृष्ण माळी, नीलेश मरकाडे यांनी  मान्यवरांचे स्वागत केले. 

ज्येष्ठ शेतकर्‍यांना पेन्शन लागू करावी - सिरस्कारबाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी  कार्यक्रमाला सोमवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी हिताचा  विचार होणे गरजेचे आहे; परंतु शासन शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी संपला पाहिजे.  या दृष्टिकोनातूत कृषीविषयक धोरणे राबविली जात आहेत. शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या शेतीचा  विकास झाला पाहिजे, यासाठी काम करण्याची गरज आहे. शासकीय कर्मचार्‍यांना सेवानवृत्तीनंतर  पेन्शन मिळते, तशीच पेन्शन आमच्या ज्येष्ठ शेतकर्‍यांसाठी लागू झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे  गरजेचे आहे, असे मत आमदार बळीराम सिरस्कार यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांचे संघटन मजबूत व्हावे - मसनेधर्मादाय आयुक्त के.व्ही. मसने यांनी बोलताना शेतकरी जाती-धर्मात विभागल्या गेला आहे. यातून  बाहेर पडून शेतकर्‍यांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. शेतकर्‍याला स्वावलंबी  बनविण्यासाठी ध्येय-धोरणे राबविण्याची गरज आहे, असे मत मांडले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटील