शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:25 IST

जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काही वर्षांपूर्वी शेती व्यवसाय श्रेष्ठ समजला जात होता. व्यापार मध्यम आणि नोकरी  कनिष्ठ अशी परिस्थिती होती; परंतु आता उलट झाले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. शेतीला  पूरक व्यवस्था उभी झाली नाही. सिंचनाची व्यवस्था झाली नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सा पडला; परंतु आता जिल्हय़ातील सिंचनाच्या प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्षभरामध्ये  शेतकर्‍यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असे सांगत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शे तकर्‍यांनी शेतीसोबतच जोडधंद्यांकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले आणि जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला सोमवारी दुपारी त्यांनी सदिच्छा भेट  दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत भाजपच्या विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अँड. मो तीसिंह मोहता, भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी,  शरद झांबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अँड. मोतीसिंह मोहता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील, शिवाजी म्हैसने, डॉ.  गजानन काकड, उज्ज्वल ठाकरे, प्रकाश कळंब, शिवराव राखोंडे, मधुकर सरप, राजू महल्ले,  कैलास शहापूरकर, सुरेश राऊत, श्रीकृष्ण बिल्लेवार, श्रीकृष्ण माळी, नीलेश मरकाडे यांनी  मान्यवरांचे स्वागत केले. 

ज्येष्ठ शेतकर्‍यांना पेन्शन लागू करावी - सिरस्कारबाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ व्या पुण्यतिथी  कार्यक्रमाला सोमवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी हिताचा  विचार होणे गरजेचे आहे; परंतु शासन शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी संपला पाहिजे.  या दृष्टिकोनातूत कृषीविषयक धोरणे राबविली जात आहेत. शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या शेतीचा  विकास झाला पाहिजे, यासाठी काम करण्याची गरज आहे. शासकीय कर्मचार्‍यांना सेवानवृत्तीनंतर  पेन्शन मिळते, तशीच पेन्शन आमच्या ज्येष्ठ शेतकर्‍यांसाठी लागू झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे  गरजेचे आहे, असे मत आमदार बळीराम सिरस्कार यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांचे संघटन मजबूत व्हावे - मसनेधर्मादाय आयुक्त के.व्ही. मसने यांनी बोलताना शेतकरी जाती-धर्मात विभागल्या गेला आहे. यातून  बाहेर पडून शेतकर्‍यांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. शेतकर्‍याला स्वावलंबी  बनविण्यासाठी ध्येय-धोरणे राबविण्याची गरज आहे, असे मत मांडले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटील