शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: November 19, 2014 01:56 IST

लोकमत संवाद; आ. बळीराम सिरस्कार यांचे सुतोवाच .

अकोला : शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत होऊन काम करणार्‍या भारिप-बहुजन महासंघातर्फे विधानसभा निवडणूक लढविताना सलग दुसर्‍यांदा विजयी झालेले आमदार बळीराम सिरस्कार येणार्‍या काळात वीज निर्मिती प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्यासोबतच सिंचन क्षमता वाढविणे आणि खारपाणपट्टय़ातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. बेरोजगारांची प्रश्न गंभीर स्वरुप घेत असल्याने शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मतदारसंघात प्रयत्न करणार असल्याचे मत आ. सिरस्कार यांनी मंगळवारी लोकमतच्या संवाद कार्यक्रमात संपादकीय विभागातील सहका-यांसोबत चर्चा कताना व्यक्त केले. प्रश्न : लेमन सिटी म्हणून अकोल्याची ओळख आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी बाळापूर मतदारसंघाचा वाटा मोठा आहे. अलिकडच्या काळात मात्र लिंबू उत्पादनात घट होताना दिसत आहे. ते वाढविण्यासाठी काही उपाययोजना आहेत काय?आ. सिरस्कार: बाळापूर मतदासंघातील वाडेगाव परिसरात कांदा आणि लिंबू उत्पादन मोठय़ाप्रमाणावर होते. या पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग येथे उभे झाले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय सामुहिक शेतीचा प्रयोग राबविल्यास कांदा आणि लिंबू उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या मालासाठी जागेवरच चांगल्या दर मिळू शकतील. बाळापूर मतदारसंघातील, विशेषत: बाळापूर शहरातीलच रस्ते व पुलांचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात?आ. सिरस्कार: बाळापूर शहरातील रस्त्यांसाठी १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मोहरम उत्सवामुळे रस्त्याचे काम बंद होते. ते पुन्हा सुरू होत आहे. पुल, पुलांवरील कठड्यांसाठी पाठपुरावा सुरू असून काही कामांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पुलाच्या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून निधी मंजुर झाला आहे. निधी मिळातच काम सुरू होईल. रस्त्यांसोबतच स्मशान भूमीच्या समस्या सोडविण्यासही प्राधान्य दिले आहे. प्रश्न : हैदराबाद-इंदोर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम पातूर तालुक्यात रखडले आहे. ते सुरू करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न केलेत?आ. सिरस्कार: हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. नादेंड विभागातील काम सुरू आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या मार्गाचे कामही लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू.प्रश्न :ऐतिहासिक वारसा लाभलेले दोन तालुके मतदारसंघात आहेत. त्यादृष्टीने पर्यटन वाढीकरिता काय प्रयत्न करणार आहे?आ. सिरस्कार: मतदारसंघातील तिर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहे. बाळापूरच्या किल्लयाचे वैभव टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न झालेत. पर्यटन वाढीसाठी बाळापूर आणि पातूरमध्ये बराच वाव आहे. त्यासाठी काही प्रस्ताव तयार करून ते शासनाकडे पाठवू. प्रश्न - वाडेगाव परिसरातील लिंबाने भारतीय बाजारपेठेत नावलौकिक प्राप्त केला आहे; परंतु लिंबावर आधारित प्रकिया उद्योग व लिंबाचे क्षेत्र घटले आहे. यासंबधी आपण काय करणार?आ. सिरस्कार: हा अत्यंत जिव्हाळ्य़ाचा प्रश्न असून, या भागातील लिंबू उत्पादनाचे क्षेत्र वाढलेच पाहिजे आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा झालाच पाहिजे, या मताचे आपण आहोत. या प्रश्नावर लक्ष देणार आहे. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. प्रश्न :- भारिप-बमसंला सर्वच समाजाची मतं का मिळत नाहीत?आ. सिरस्कार :- प्रत्येक समाजघटकाला निवडणुकीत संधी देणे हे भारिप-बमसंचे धोरण आहे. भारिप-बमसंला इतर समाजातील मतं कमी प्रमाणात मिळतात. इतर समाजातील जास्त मतं न मिळण्यासाठी अनेक कारणं आहेत. प्रश्न :- विकासकामांच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणार काय ?आ. शिरस्कार :- दिंडी मार्गातील पथदिवे फोडले जातात. ही संपत्ती आपली स्वत:ची आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. लोकसहभागातूनच देखभाल शक्य आहे.