शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: November 19, 2014 01:56 IST

लोकमत संवाद; आ. बळीराम सिरस्कार यांचे सुतोवाच .

अकोला : शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत होऊन काम करणार्‍या भारिप-बहुजन महासंघातर्फे विधानसभा निवडणूक लढविताना सलग दुसर्‍यांदा विजयी झालेले आमदार बळीराम सिरस्कार येणार्‍या काळात वीज निर्मिती प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्यासोबतच सिंचन क्षमता वाढविणे आणि खारपाणपट्टय़ातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. बेरोजगारांची प्रश्न गंभीर स्वरुप घेत असल्याने शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मतदारसंघात प्रयत्न करणार असल्याचे मत आ. सिरस्कार यांनी मंगळवारी लोकमतच्या संवाद कार्यक्रमात संपादकीय विभागातील सहका-यांसोबत चर्चा कताना व्यक्त केले. प्रश्न : लेमन सिटी म्हणून अकोल्याची ओळख आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी बाळापूर मतदारसंघाचा वाटा मोठा आहे. अलिकडच्या काळात मात्र लिंबू उत्पादनात घट होताना दिसत आहे. ते वाढविण्यासाठी काही उपाययोजना आहेत काय?आ. सिरस्कार: बाळापूर मतदासंघातील वाडेगाव परिसरात कांदा आणि लिंबू उत्पादन मोठय़ाप्रमाणावर होते. या पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग येथे उभे झाले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय सामुहिक शेतीचा प्रयोग राबविल्यास कांदा आणि लिंबू उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या मालासाठी जागेवरच चांगल्या दर मिळू शकतील. बाळापूर मतदारसंघातील, विशेषत: बाळापूर शहरातीलच रस्ते व पुलांचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात?आ. सिरस्कार: बाळापूर शहरातील रस्त्यांसाठी १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मोहरम उत्सवामुळे रस्त्याचे काम बंद होते. ते पुन्हा सुरू होत आहे. पुल, पुलांवरील कठड्यांसाठी पाठपुरावा सुरू असून काही कामांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पुलाच्या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून निधी मंजुर झाला आहे. निधी मिळातच काम सुरू होईल. रस्त्यांसोबतच स्मशान भूमीच्या समस्या सोडविण्यासही प्राधान्य दिले आहे. प्रश्न : हैदराबाद-इंदोर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम पातूर तालुक्यात रखडले आहे. ते सुरू करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न केलेत?आ. सिरस्कार: हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. नादेंड विभागातील काम सुरू आहे. जिल्ह्यातून जाणार्‍या मार्गाचे कामही लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू.प्रश्न :ऐतिहासिक वारसा लाभलेले दोन तालुके मतदारसंघात आहेत. त्यादृष्टीने पर्यटन वाढीकरिता काय प्रयत्न करणार आहे?आ. सिरस्कार: मतदारसंघातील तिर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहे. बाळापूरच्या किल्लयाचे वैभव टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न झालेत. पर्यटन वाढीसाठी बाळापूर आणि पातूरमध्ये बराच वाव आहे. त्यासाठी काही प्रस्ताव तयार करून ते शासनाकडे पाठवू. प्रश्न - वाडेगाव परिसरातील लिंबाने भारतीय बाजारपेठेत नावलौकिक प्राप्त केला आहे; परंतु लिंबावर आधारित प्रकिया उद्योग व लिंबाचे क्षेत्र घटले आहे. यासंबधी आपण काय करणार?आ. सिरस्कार: हा अत्यंत जिव्हाळ्य़ाचा प्रश्न असून, या भागातील लिंबू उत्पादनाचे क्षेत्र वाढलेच पाहिजे आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा झालाच पाहिजे, या मताचे आपण आहोत. या प्रश्नावर लक्ष देणार आहे. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. प्रश्न :- भारिप-बमसंला सर्वच समाजाची मतं का मिळत नाहीत?आ. सिरस्कार :- प्रत्येक समाजघटकाला निवडणुकीत संधी देणे हे भारिप-बमसंचे धोरण आहे. भारिप-बमसंला इतर समाजातील मतं कमी प्रमाणात मिळतात. इतर समाजातील जास्त मतं न मिळण्यासाठी अनेक कारणं आहेत. प्रश्न :- विकासकामांच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणार काय ?आ. शिरस्कार :- दिंडी मार्गातील पथदिवे फोडले जातात. ही संपत्ती आपली स्वत:ची आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. लोकसहभागातूनच देखभाल शक्य आहे.