शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी प्रभावी कायदा करा - रणधीर सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 15:31 IST

दोषींना कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी विधानसभेत आ. रणधीर सावरकर यांनी केली.

अकोला : सायबर गुन्ह्याला आळा घालण्याची नितांत आवश्यकता असून, अशा गुन्ह्यांची उकल होऊन दोषींना कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी विधानसभेत आ. रणधीर सावरकर यांनी केली.आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक व्यवहार पार पडत आहेत. ग्रामीण भागात शासकीय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ई-मेल, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदी माध्यमातून व्यवहार केल्या जात आहेत. इंटरनेटच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अपेक्षित जनजागृती होत नसल्यामुळे मागील काही दिवसांत सायबर गुन्ह्यात वाढ झाल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मागील ५ वर्षात राज्यात १६ हजार ५१ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून, पोलीस तपास यंत्रणेला केवळ २८ टक्के गुन्ह्यांची उकल करणे शक्य झाले का, यासाठी राज्यात स्वतंत्र सायबर कक्ष सुरू केले का, असे नानाविध प्रश्न आ. सावरकर यांनी उपस्थित केले. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणांमध्ये राज्यभरात ६,०२० आरोपींना अटक केल्याचे सांगत सायबर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस घटकातील एकूण ३,२५३ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Randhir Savarkarरणधीर सावरकरAkolaअकोला