शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचा मापदंड हवा!

By संतोष येलकर | Updated: April 17, 2023 17:53 IST

आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांचे मत

संतोष येलकर, अकोला: ग्रामीण भागात आजही पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ४.०८ टक्के असून, ही समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण हा साक्षरतेचा मापदंड मानावा , असे मत नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांनी १५ एप्रिल रोजी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता, ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट देवून, संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले. देशात शिक्षणक्रांती झाली पाहीजे. त्यामध्ये शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचे प्रमाण मानावे , यादृष्टीने आंबेडकरवादी मिशनच्यावतीने विशेष अभियान राबविण्यात येत असून, जनजागृती केली जात आहे. या अभियानात राज्यातील प्रत्येक जिल्हयात शिक्षण परिषद घेवून शिक्षणाचे ‘आॅडीट’ केले जाइल, अशी माहती दिपक कदम यांनी दिली. तळागाळातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जावून सामाजिक बांधिलकीतून काम करावे, या हेतूने आंबेडकरवादी मिशनचे काम सुरु आहे. त्यामध्ये मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १८२ आयएएस, आयपीएस अधिकारी आणि २०० पेक्षा अधिक पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय) दर्जाचे अधिकारी तयार झाले असून, प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम मिशनच्या माध्यमातून सुरु असल्याचे कदम यांनी सांगीतले.

अधिकाऱ्यांनी मानवी चेहऱ्याने काम केल्यास समस्या निकाली निघतील!

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मानवी चेहऱ्याचे होवून काम केल्यास समाजाच्या बहुतांश समस्या निकाली निघतील, या जाणिवेतून आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम सुरु आहे, असे दिपक कदम म्हणाले.

३०० विद्यार्थ्यांकडून स्पर्धा, परिक्षेची तयारी सुरु!

नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनमध्ये गोरगरिब, सर्वसामान्य कुटुंबातील ३०० पदवीधर विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांकडून यूपीएससी, एमपीएससी, बॅंकींग आदी स्पर्धा परिक्षेची तयारी केली जात आहे. तसेच दरवर्षी किमान १०० गरिब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेवून, कोणतेही शुल्क न घेता,त्यांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार करण्याचे काम आंबेडकरवादी मिशनकडून करण्यात येत आहे, असेही दिपक कदम यांनी सांगीतले.

टॅग्स :Akolaअकोला