शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचा मापदंड हवा!

By संतोष येलकर | Updated: April 17, 2023 17:53 IST

आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांचे मत

संतोष येलकर, अकोला: ग्रामीण भागात आजही पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ४.०८ टक्के असून, ही समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण हा साक्षरतेचा मापदंड मानावा , असे मत नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांनी १५ एप्रिल रोजी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता, ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट देवून, संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले. देशात शिक्षणक्रांती झाली पाहीजे. त्यामध्ये शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचे प्रमाण मानावे , यादृष्टीने आंबेडकरवादी मिशनच्यावतीने विशेष अभियान राबविण्यात येत असून, जनजागृती केली जात आहे. या अभियानात राज्यातील प्रत्येक जिल्हयात शिक्षण परिषद घेवून शिक्षणाचे ‘आॅडीट’ केले जाइल, अशी माहती दिपक कदम यांनी दिली. तळागाळातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जावून सामाजिक बांधिलकीतून काम करावे, या हेतूने आंबेडकरवादी मिशनचे काम सुरु आहे. त्यामध्ये मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १८२ आयएएस, आयपीएस अधिकारी आणि २०० पेक्षा अधिक पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय) दर्जाचे अधिकारी तयार झाले असून, प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम मिशनच्या माध्यमातून सुरु असल्याचे कदम यांनी सांगीतले.

अधिकाऱ्यांनी मानवी चेहऱ्याने काम केल्यास समस्या निकाली निघतील!

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मानवी चेहऱ्याचे होवून काम केल्यास समाजाच्या बहुतांश समस्या निकाली निघतील, या जाणिवेतून आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम सुरु आहे, असे दिपक कदम म्हणाले.

३०० विद्यार्थ्यांकडून स्पर्धा, परिक्षेची तयारी सुरु!

नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनमध्ये गोरगरिब, सर्वसामान्य कुटुंबातील ३०० पदवीधर विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांकडून यूपीएससी, एमपीएससी, बॅंकींग आदी स्पर्धा परिक्षेची तयारी केली जात आहे. तसेच दरवर्षी किमान १०० गरिब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेवून, कोणतेही शुल्क न घेता,त्यांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार करण्याचे काम आंबेडकरवादी मिशनकडून करण्यात येत आहे, असेही दिपक कदम यांनी सांगीतले.

टॅग्स :Akolaअकोला