शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

लेमन सिटीवर आर्थिक संकट !

By admin | Updated: November 18, 2016 03:00 IST

निर्यातक्षम लिंबाची बाजारपेठ कोसळली !

राजरत्न सिरसाटअकोला, दि. १७- पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने शेती अर्थकारणावर याचा अधिक प्रभाव पडला आहे. भाजीपाला, फळांसारख्या नाशवंत वस्तूची खरेदी-विक्री कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अकोला जिल्हा लिंबू उत्पादक जिल्हा म्हणून विदर्भात प्रख्यात आहे. म्हणूनच अकोला शहराला लेमन सिटी हे नाव पडले आहे; पण या लेमन सिटीवर आजमितीस आर्थिक संकट घोंगावत आहे.जिल्हय़ात लिंबू फळपिकाचे क्षेत्र हे ७५ हजार हेक्टरच्यावर होते; पण आजमितीस हे क्षेत्र २,४00 हेक्टरवर आले आहे. निर्यातक्षम दर्जाचे लिंबू उत्पादन येथे घेतले जाते. देशातील प्रत्येक प्रांतात वाडेगावचा लिंबू प्रसिद्ध आहे. दिल्ली,पंजाब, काश्मीरच्या बाजारपेठेत या लिंबची मोठी मागणी आहे, तसेच लिंबूवर प्रक्रिया करणारा राज्यातील पहिला कारखाना जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सुरू करण्यात आला होता; पण सुविधा आणि अनुदानाअभावी हा कारखाना बंद पडला. लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे.तशीच वाडेगाव येथे विदर्भातील मोठी लिंबूची बाजारपेठ आहे; पण पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटासारखीच अवकळा या लिंबूला आली आहे. व्यापार्‍याकडे पैसा नसल्याने मागील आठ दिवसांपासून येथील लिंबू खरेदी ठप्प पडली आहे. दररोज तीन ते चार हजार गोण्या उत्पादन आहे; परंतु कोणी घेणाराच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तीच परिस्थिती अकोला शहरातील बाजारात आहे. बाजारात सध्या तीनशे ते साडेतीनशे गोण्या लिंबूची आवक आहे. बाजारात एक किलो लिंबूची किंमत २0 ते २२ रुपये होती आता १४ ते १५ रुपयानेप्रमाणे लिंबू विकला जात आहे. एकूणच वाडेगाव आणि अकोला बाजारपेठ मिळून पाच ते दहा लाख रुपयाचे लिंबू खरेदी-विक्रीचे व्यवहार १0 ते २0 टक्कय़ावर आले आहेत. शेतकर्‍यांकडे पैसेच नसल्याने वाहतूक करणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांकडील लिंबू सडण्याचे प्रकार घडत आहेत. पाण्याची अनिश्‍चितता, लिंबू उत्पादकाकडे होत असलेले शासनाचे दुर्लक्ष यामुळे अगोदरच लिंबूचे क्षेत्र घटले आहे. वाडेगाव जिल्हय़ातील काही शेतकर्‍यांनी प्रतिकूल परिस्थितीत काही क्षेत्र टिकवून ठेवले आहे; परंतु अचानक पैशाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने लिंबूची बाजारपेठ कोसळली असून, भाजीपाला, धान्य इतर सर्वच प्रकारचे व्यवहार ठप्प पडल्याने लेमन सिटीवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.पैशाचा तुटवडा आणि ग्राहक व शेतकरी, व्यापार्‍यांकडे पैसेच नसल्याने लिंबू खरेदी-विक्रीवर मोठे परिणाम झाले आहेत. बाजारात पाचशे, सातशे लिंबूच्या गोण्या येत होत्या. हे प्रमाण अध्र्यापेक्षा कमी झाले आहे. कोणी घेणाराच नसल्याने लिंबूचे दर कोसळले आहेत.- किशोर ढोमणे,लिंबू व्यापारी, जनता ठोक भाजीबाजार, अकोला.