शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

पर्यावरणपुरक होळीसाठी हवा सर्वांचाच पुढाकार

By admin | Updated: March 5, 2015 01:56 IST

परिचर्चेतील सूर; वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न हवे.

अकोला : होळी साजरी करताना वृक्षांची बेसुमार कत्तल केली जाते. ही वृक्षतोड रोखण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणपूरक होळी साजरी करूया, लाकूड आणि गोवर्‍यांऐवजी परिसरातील कचरा जाळूया, होळीत टाकण्यात येतो. यातून पर्यावरणाचा र्‍हास होतो. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी पर्यावरण पुरक होळी साजरी करणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांचाच पुढाकार असणे आवश्यक असल्याचा सूर बुधवार, ४ मार्च रोजी लोकमत शहर कार्यालयात आयोजित परिचर्चेत उमटला. ह्यपर्यावरण पूरक होळी..ह्ण या विषयावर पार पडलेल्या परिचर्चेत अकोला वन्यजीव विभागाचे गोविंद पांडे, अकोलेकरांना वेळोवेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या निसर्ग कट्टय़ाचे गौरव झटाले, वन्यजीव आणि पर्यावरण व संवर्धन संस्थेचे प्रतिनिधी शिशिर शेंडोकार, स्वावलंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांंना पर्यावरणाचे धडे देणारे राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर हरीश शर्मा सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने होळीत आपण ज्याचा इंधन म्हणून वापर करतो, ती लाकडे व उत्तम प्रकारचे शेणखत असलेल्या गोवर्‍या जाळण्यात येतात. इंधनासाठी वृक्षांची होणारी कत्तल, हिरवे वृक्ष तोडले जातात. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. ते थांबविण्यासाठी होळीत लाकडे न जाळता घरासमोरील वा परिसरातील केरकचरा, जळाऊ पदार्थ याची होळी केल्यास परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्यात हातभार लागेल. तसेच होळीत पुरणपोळीचा नैवेद्य टाकून उच्च दर्जाचे पोषणमूल्ये असलेले अन्न वाया न घालवता ते आापल्या परिसरातील गोरगरीब, भिकारी, अनाथ, गरजू लोकांना तसेच पशुपक्षी व प्राण्यांना देण्यात यावे आणि दुर्गुणांचे दहन करून सद्गुणांचा अंगीकार करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे असे कळवळीचे आवाहन यावेळी परिचर्चेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी अकोलेकरांना केले.