शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

ई-महासेवा केंद्र संचालकांची गळचेपी

By admin | Updated: July 18, 2014 00:45 IST

केंद्र संचालकांना एका खासगी कंपनीची पॉलिसी काढणे बंधनकारक; ई-महासेवा केंद्र संचालकांना असुविधा.

डॉ. किरण वाघमारे /अकोलानागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे काढण्याकरिता सुविधा निर्माण व्हावी, यासाठी ठिकठिकाणी ई-महासेवा केंद्र सुरू करण्यात आले. सी.एम.एस. या कंपनीकडून ही सुविधा नागरिकांना पुरविण्यात आली. नागरिकांची सुविधा तर झाली; परंतु केंद्र संचालकांना एका खासगी कंपनीची पॉलिसी काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ई-महासेवा केंद्र संचालकांना केंद्र चालविताना असुविधा होत आहे. शैक्षणिक आणि नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी तसेच रेशनकार्डसारखी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी यापूर्वी नागरिकांना तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. यासाठी नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. तसेच काम लवकर होईल की नाही, याची शाश्‍वती नव्हती. कागदपत्रांसाठी दस्तऐवज लेखकाकडून (वाईंडर) अर्ज लिहून घ्यावा लागत असे. या कामात पूर्ण दिवस जात असे. कागदपत्रे काढण्याच्या कामात पारदर्शकता यावी, कामे लवकर व्हावी आणि सर्व कामे एकाच खिडकीत व्हावी, यासाठी राज्य शासनाने सुरुवातीला एक खिडकी योजना राबविली. पुढे स्वतंत्र सेतू केंद्र स्थापित करण्यात आले. आता ई-महासेवा केंद्र नावाने सेवा देण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातील ई-महासेवा केंद्र चालू करण्याची जबाबदारी सी.एम.एस. या कंपनीकडे देण्यात आली आहे. केवळ कागदपत्रेच नाही तर इलेक्ट्रिक बिल भरणे, टेलिफोन बिल, डीटीएच, मोबाईल रिचार्जसारखी कामेदेखील ई-महासेवा केंद्राच्या माध्यमातून होऊ लागली आहेत. ई-महासेवा केंद्रात मिळणार्‍या सुविधा नागरिकांच्या पचनी पडल्या आणि त्यांचा केंद्राकडे ओढा वाढू लागला आहे. नागरिकांचा ओढा लक्षात घेऊन केंद्रांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राज्यातील सर्व जिल्हा ठिकाणे आणि तालुका स्तरावर ई-महासेवा केंद्र सुरू झालेले आहेत; परंतु या केंद्रांच्या मानगुटीवर सध्या पॉलिसी टार्गेटचे भूत बसले आहे. ह्यभारती एक्सा हॉस्पिटल कॅश पॉलिसीह्ण नावाची ही पॉलिसी फक्त रुग्णालयातील उपचारासाठी आहे. या पॉलिसीत ७५0 रुपयांचा प्रिमियम भरावा लागतो. या बदल्यात ई-महासेवा केंद्र संचालकाला ९३ रुपये कमिशन देण्यात येते. या पॉलिसीची मुदत १ वर्षाकरिता आहे. प्रत्येक केंद्र संचालकाला दर महिन्याला १0 पॉलिसींची सक्ती करण्यात आली आहे. पॉलिसी न काढल्यास केंद्र बंद करण्याचा किंवा सुविधा बंद करण्याचा इशारादेखील कंपनीकडून ई-मेलद्वारे केंद्र संचालकांना देण्यात आला आहे. यामुळे ई-महासेवा केंद्र संचालकांवर सध्या केंद्र चालवावे की पॉलिसीधारक बनवावे, असा पेच निर्माण झाला आहे. राज्यात हजारो ई-महासेवा केंद्र आहेत. प्रत्येक केंद्राला दर महिन्याला १0 पॉलिसी काढण्याचे बंधन आहे. एका पॉलिसीचे ७५0 रुपये याप्रमाणे दर महिन्याला ७ हजार ५00 रुपये प्रत्येक केंद्र संचालकाला भरावे लागतात. केंद्र चालविण्यासाठी येणारा खर्च, भाडे, वीज बिल, इंटरनेट बिल, मोबाईल बिल, स्टेशनरी व इतर किरकोळ खर्च भागवतांनाच केंद्र संचालकांच्या नाकीनऊ येतात. त्यात पॉलिसीचा खर्च वाढल्यामुळे केंद्र कसे चालवावे, हा पेच त्यांच्यापुढे आहे. काही केंद्र चालकांनी हा भुर्दंड ग्राहकांवर टाकणे सुरू केले आहे. याकरिता ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क घेण्यात येत आहे. ही पॉलिसीची अट रद्द करण्याची मागणी ई-महासेवा केंद्र चालकांकडून होत आहे.*सी.एम.एस. कंपनीकडे ई-महासेवा केंद्राची जबाबदारीराज्यातील सर्व ई-महासेवा केंद्र संचालनाची जबाबदारी सी.एम.एस. या कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीने प्रत्येक जिल्हय़ात आपले व्यवस्थापक नियुक्त केले आहेत. हे व्यवस्थापक त्या-त्या जिल्हय़ातील ई-महासेवा केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवतात. केंद्रात जे पैसे ग्राहकांकडून घेतले जातात, ते सगळे कंपनीकडे आधी जमा होतात आणि मग महिन्याच्या शेवटी त्यातील १0 टक्के पैसे कमिशन स्वरूपात ई-महासेवा केंद्र संचालकांच्या बँक खात्यात जमा केले जातात.