शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

अकोला जिल्ह्यात ५६ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी

By atul.jaiswal | Updated: September 13, 2022 18:39 IST

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी १६ ऑगस्टअखेर ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अकोला : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी १६ ऑगस्टअखेर ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीत २,१२,६५२ शेतकरी लाभार्थीपैकी फक्त १,५६,२८१ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या लाभार्थींना १२व्या हप्त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.  मात्र अद्यापही ७७,२७७ लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे १६ सप्टेंबरनंतर या योजनेचा लाभ विसरा, अशी सध्याची स्थिती आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ई-केवासयी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये जिल्ह्यात २,१२,६५२ लाभार्थींनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. यापैकी अद्याप ७७,२७७ लाभार्थींची ई-केवायसी बाकी असल्याने आगामी हप्ता जमा करण्यासाठी त्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर शुक्रवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. 

टॅग्स :Akolaअकोला