शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोचालकांची दादागिरी, पोलिसांवर भारी!

By admin | Updated: October 1, 2015 02:24 IST

ऑटोरिक्षांच्या रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे अकोला शहरातील रस्ते झाले अरुंद .

अकोला: शहरात ऑटोरिक्षांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ऑटोरिक्षांमुळे शहरातील प्रत्येक रस्ता व्यापला गेला आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गांधी चौक, कोतवाली चौकांमध्ये तर ऑटोरिक्षा चालकांची मक्तेदारीच निर्माण झाली असून, प्रमुख मार्गांवर ऑटोरिक्षा चालकांचे वाढते अतिक्रमण अपघातांना आमंत्रण देत आहे. ऑटोरिक्षा चालकांनी थेट रस्त्यांवरच अतिक्रमण केल्यामुळे रुंद रस्ते अरुंद झाले असल्याने वाहन काढण्यास जागाच नसल्याने वाहनचालकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. यावरून शहरातील रस्त्यांवर ऑटोरिक्षा चालकांची वाढती दादागिरी, पोलिसांवर भारी पडत आहे. मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास टॉवर चौकातून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या एका दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडत नेल्यामुळे एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात महिलेच्या देहाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. महिलेच्या वाहनाला रस्त्याच्या बाजूला जाण्यासाठी थोडीतरी जागा मिळाली असती तर अपघात टळला असता. परंतु बसस्थानकासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ऑटोरिक्षा चालक आणि किरकोळ व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते लहान झाले असून, वाहने पुढे काढायला थोडीही जागा मिळत नसल्याने, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ऑटोरिक्षा चालकांना ऑटोस्टँडसाठी जागा देण्यात आली असताना, ऑटोरिक्षा स्टँडवर उभे न करता, रस्त्यांवर उभे केले जातात. ऑटोरिक्षा चालकांची दादागिरी वाढत असून, पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची हिंमत गेली आहे. रस्त्यांवर ऑटोरिक्षा उभे केल्याचे सर्रास चित्र, बसस्थानक समोरील दोन्ही प्रवेशद्वार, हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकाकडून गांधी रोडकडे जाणार्‍या कडेला ऑटोरिक्षाचालक रस्त्यांवरच ऑटो उभे करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ऑटोचालक रस्त्यांवर अतिक्रमण करीत असताना, वाहतूक पोलीस मात्र, बघ्याची भूमिका घेता. वाहतुकीचे नियंत्रण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे. परंतु वाहतूक पोलीसच त्यांच्या कर्तव्यापासून दूर जात असल्याने, त्यांच्या डोळय़ांदेखत अपघाताच्या घटना घडतात. शहराच्या बेशिस्त वाहतुकीमध्ये ऑटोरिक्षा चालकांचा सर्वात मोठा वाटा आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांना ऑटोरिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारावाच लागेल.