शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

निवडणुकीच्या काळात धान्यासाठी नॉमिनीही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:57 IST

नो-नेटवर्क असलेल्या क्षेत्रातच ही सूट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क क्षेत्रातही आधार लिंकिंगविना नॉमिनींना धान्य वाटप केले जाते.

- सदानंद सिरसाटअकोला: लाभार्थींना बायोमेट्रिक ओळख पटवूनच एइपीडीएसद्वारे धान्य वाटप करण्याला फाटा देत सप्टेंबर महिन्यातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत १६ जिल्ह्यांमध्ये तब्बल २० हजारांवर शिधापत्रिकांधारकांचे धान्य नॉमिनींना वाटप केले जात आहे. या प्रकरणातही अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांनी सर्वच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल मागवला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे.शासनाकडून पॉसद्वारे विक्री झालेल्या धान्याचा दैनंदिन आढावा घेतला जातो. ज्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये नो-नेटवर्क आहे. त्या ठिकाणी शिधापत्रिकाधारकांचे आधार कार्ड पडताळणीऐवजी नॉमिनींची ओळख पटवून धान्य वाटपाची मुभा आहे. नॉमिनींची ओळख पटवण्यासाठी पुरवठा विभागाच्या रुट आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. नो-नेटवर्क असलेल्या क्षेत्रातच ही सूट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क क्षेत्रातही आधार लिंकिंगविना नॉमिनींना धान्य वाटप केले जाते. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याच्या संधीचा पुरेपूर वापर दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जातो. हा प्रकार विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत प्रचंड वाढला.सप्टेंबर २०१९ मधील नॉमिनींना होत असलेल्या वाटपाच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाली आहे. १६ जिल्ह्यांमध्ये तर काळाबाजार करण्याची हीच संधी आहे, हे ठरवत वाटप होत आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या वाटपाच्या आढाव्यात १६ जिल्ह्यांत नॉमिनींना वाटपाचे प्रमाण उतरत्या क्रमाने काढण्यात आले. त्यापैकी सहा जिल्ह्यात आॅगस्टमध्ये २,३५,३८० शिधापत्रिकांचे धान्य नॉमिनींना देण्यात आले. ती संख्या सप्टेंबरमध्ये २,५०,३६५ एवढी झाली आहे. तब्बल १४,९८५ शिधापत्रिकांची वाढ झाली. तर उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये आॅगस्टमधील वाटपाची संख्या १,१६,३५२ असताना सप्टेंबरमध्ये ती १,२१,१६४ वर पोहोचली आहे. ४,८१२ शिधापत्रिकांचे धान्य नॉमिनींना देण्यात आले. आधीच्या महिन्यातील नॉमिनींना वाटपाचे प्रमाण ५० टक्के कमी करण्याऐवजी त्यामध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा उफराटा प्रकार पुरवठा यंत्रणेमध्ये सुरू आहे. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याची संधी दिली जात आहे.

- नॉमिनींना धान्य वाटप करणारे जिल्हेनॉमिनींच्या संख्येत प्रचंड वाढ झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती प्रथम आहे. त्यामागे उतरत्या क्रमाने रायगड, अहमदनगर, नंदुरबार, रत्नागिरी, ठाणे, गडचिरोली, बीड, सांगली, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, बुलडाणा, नाशिक, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. इतर नऊ जिल्ह्यातही प्रमाण घटण्याऐवजी वाढले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला