शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

निवडणुकीच्या काळात धान्यासाठी नॉमिनीही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:57 IST

नो-नेटवर्क असलेल्या क्षेत्रातच ही सूट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क क्षेत्रातही आधार लिंकिंगविना नॉमिनींना धान्य वाटप केले जाते.

- सदानंद सिरसाटअकोला: लाभार्थींना बायोमेट्रिक ओळख पटवूनच एइपीडीएसद्वारे धान्य वाटप करण्याला फाटा देत सप्टेंबर महिन्यातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत १६ जिल्ह्यांमध्ये तब्बल २० हजारांवर शिधापत्रिकांधारकांचे धान्य नॉमिनींना वाटप केले जात आहे. या प्रकरणातही अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांनी सर्वच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल मागवला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे.शासनाकडून पॉसद्वारे विक्री झालेल्या धान्याचा दैनंदिन आढावा घेतला जातो. ज्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये नो-नेटवर्क आहे. त्या ठिकाणी शिधापत्रिकाधारकांचे आधार कार्ड पडताळणीऐवजी नॉमिनींची ओळख पटवून धान्य वाटपाची मुभा आहे. नॉमिनींची ओळख पटवण्यासाठी पुरवठा विभागाच्या रुट आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. नो-नेटवर्क असलेल्या क्षेत्रातच ही सूट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क क्षेत्रातही आधार लिंकिंगविना नॉमिनींना धान्य वाटप केले जाते. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याच्या संधीचा पुरेपूर वापर दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जातो. हा प्रकार विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत प्रचंड वाढला.सप्टेंबर २०१९ मधील नॉमिनींना होत असलेल्या वाटपाच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाली आहे. १६ जिल्ह्यांमध्ये तर काळाबाजार करण्याची हीच संधी आहे, हे ठरवत वाटप होत आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या वाटपाच्या आढाव्यात १६ जिल्ह्यांत नॉमिनींना वाटपाचे प्रमाण उतरत्या क्रमाने काढण्यात आले. त्यापैकी सहा जिल्ह्यात आॅगस्टमध्ये २,३५,३८० शिधापत्रिकांचे धान्य नॉमिनींना देण्यात आले. ती संख्या सप्टेंबरमध्ये २,५०,३६५ एवढी झाली आहे. तब्बल १४,९८५ शिधापत्रिकांची वाढ झाली. तर उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये आॅगस्टमधील वाटपाची संख्या १,१६,३५२ असताना सप्टेंबरमध्ये ती १,२१,१६४ वर पोहोचली आहे. ४,८१२ शिधापत्रिकांचे धान्य नॉमिनींना देण्यात आले. आधीच्या महिन्यातील नॉमिनींना वाटपाचे प्रमाण ५० टक्के कमी करण्याऐवजी त्यामध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा उफराटा प्रकार पुरवठा यंत्रणेमध्ये सुरू आहे. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याची संधी दिली जात आहे.

- नॉमिनींना धान्य वाटप करणारे जिल्हेनॉमिनींच्या संख्येत प्रचंड वाढ झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती प्रथम आहे. त्यामागे उतरत्या क्रमाने रायगड, अहमदनगर, नंदुरबार, रत्नागिरी, ठाणे, गडचिरोली, बीड, सांगली, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, बुलडाणा, नाशिक, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. इतर नऊ जिल्ह्यातही प्रमाण घटण्याऐवजी वाढले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला