शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या काळात धान्यासाठी नॉमिनीही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:57 IST

नो-नेटवर्क असलेल्या क्षेत्रातच ही सूट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क क्षेत्रातही आधार लिंकिंगविना नॉमिनींना धान्य वाटप केले जाते.

- सदानंद सिरसाटअकोला: लाभार्थींना बायोमेट्रिक ओळख पटवूनच एइपीडीएसद्वारे धान्य वाटप करण्याला फाटा देत सप्टेंबर महिन्यातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत १६ जिल्ह्यांमध्ये तब्बल २० हजारांवर शिधापत्रिकांधारकांचे धान्य नॉमिनींना वाटप केले जात आहे. या प्रकरणातही अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांनी सर्वच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत अहवाल मागवला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे.शासनाकडून पॉसद्वारे विक्री झालेल्या धान्याचा दैनंदिन आढावा घेतला जातो. ज्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये नो-नेटवर्क आहे. त्या ठिकाणी शिधापत्रिकाधारकांचे आधार कार्ड पडताळणीऐवजी नॉमिनींची ओळख पटवून धान्य वाटपाची मुभा आहे. नॉमिनींची ओळख पटवण्यासाठी पुरवठा विभागाच्या रुट आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. नो-नेटवर्क असलेल्या क्षेत्रातच ही सूट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क क्षेत्रातही आधार लिंकिंगविना नॉमिनींना धान्य वाटप केले जाते. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याच्या संधीचा पुरेपूर वापर दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जातो. हा प्रकार विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत प्रचंड वाढला.सप्टेंबर २०१९ मधील नॉमिनींना होत असलेल्या वाटपाच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाली आहे. १६ जिल्ह्यांमध्ये तर काळाबाजार करण्याची हीच संधी आहे, हे ठरवत वाटप होत आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या वाटपाच्या आढाव्यात १६ जिल्ह्यांत नॉमिनींना वाटपाचे प्रमाण उतरत्या क्रमाने काढण्यात आले. त्यापैकी सहा जिल्ह्यात आॅगस्टमध्ये २,३५,३८० शिधापत्रिकांचे धान्य नॉमिनींना देण्यात आले. ती संख्या सप्टेंबरमध्ये २,५०,३६५ एवढी झाली आहे. तब्बल १४,९८५ शिधापत्रिकांची वाढ झाली. तर उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये आॅगस्टमधील वाटपाची संख्या १,१६,३५२ असताना सप्टेंबरमध्ये ती १,२१,१६४ वर पोहोचली आहे. ४,८१२ शिधापत्रिकांचे धान्य नॉमिनींना देण्यात आले. आधीच्या महिन्यातील नॉमिनींना वाटपाचे प्रमाण ५० टक्के कमी करण्याऐवजी त्यामध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा उफराटा प्रकार पुरवठा यंत्रणेमध्ये सुरू आहे. त्यातून धान्याचा काळाबाजार करण्याची संधी दिली जात आहे.

- नॉमिनींना धान्य वाटप करणारे जिल्हेनॉमिनींच्या संख्येत प्रचंड वाढ झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती प्रथम आहे. त्यामागे उतरत्या क्रमाने रायगड, अहमदनगर, नंदुरबार, रत्नागिरी, ठाणे, गडचिरोली, बीड, सांगली, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, बुलडाणा, नाशिक, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. इतर नऊ जिल्ह्यातही प्रमाण घटण्याऐवजी वाढले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला