शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

कोरोनाकाळात अकोला जिल्ह्यात ७४ बालकांनी गमावले पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 10:57 IST

Akola News : या सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

- संतोष येलकर

अकोला : कोरोनाकाळात जिल्ह्यात पालक गमावलेल्या १८ वर्षांआतील बालकांचे संपर्क सर्वेक्षण जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून, या सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुषंगाने २१ मेपर्यंत जिल्ह्यात ७४ बालकांच्या पालकांचा (आई किंवा वडील यापैकी एक) कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानुषंगाने गेल्या १३ महिन्यांच्या कोरोना काळात जिल्ह्यातील ७४ बालकांचे पालक गमावल्याचे वास्तव समोर आले आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाल्याने १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील अनेक बालकांचे पालक गमावले. त्यामध्ये काही बालकांचे पितृछत्र तर काही बालकांचे मातृछत्र हरवले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरानामुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिका व जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पालक गमावलेल्या १८ वर्षांआतील बालकांची माहिती घेण्यात आली. त्यानुसार कोरोना काळात २१ मेपर्यंत जिल्ह्यात ७४ बालकांचे पालक गमावले. त्यामध्ये काही बालकांची आई तर काही बालकांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे जिल्ह्यातील ७४ बालकांचे पालक गमावल्याचा अहवाल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत २४ मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला.

 

असा आहे सर्वेक्षण अहवाल!

कोरोना काळात २१ मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्ग झाल्याने ९०७ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामध्ये ५० वर्षांआतील १६० व्यक्तींचा मृत्यूचा समावेश असून, ५० वर्षांआतील व्यक्तींचा मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांसोबत संपर्क साधून सर्वेक्षणात माहिती घेण्यात आली. त्यानुसार कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ७४ बालकांनी पालक गमावले असून, त्यामध्ये काही बालकांची आई व काही बालकांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा समावेश आहे.

गृह भेटीद्वारे चौकशीनंतर बालकांचे होणार पुनर्वसन !

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत गृह भेटीद्वारे लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित कुटुंबीयांसोबतच चर्चा केल्यानंतर कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याची उपाययोजना बालकल्याण समितीमार्फत करण्यात येणार आहे.

कोरोना काळात जिल्ह्यात २१ मेपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांचे संपर्क सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना काळात ७४ बालकांच्या पालकांचा (आई किंवा वडील यापैकी एक) मृत्यू झाला. पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याची उपाययोजना बालकल्याण समितीमार्फत करण्यात येणार आहे.

- विलास मरसाळे,

जिल्हा महिला बालविकास अधिकारी

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या