शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला जिल्हय़ात स्वामित्वधन बुडवून वीटभट्ट्यांवर मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 07:38 IST

जिल्ह्यात प्रदूषण अधिनियमाला हरताळ फासून सुरू असलेल्या वीटभट्टय़ांवर विटांसाठी स्वामित्वधनाची रक्कम न भरताच अवैधपणे कोट्यवधींची माती वापरली जात असल्याचा प्रकार घडत आहे.

अकोला : जिल्ह्यात प्रदूषण अधिनियमाला हरताळ फासून सुरू असलेल्या वीटभट्टय़ांवर विटांसाठी स्वामित्वधनाची रक्कम न भरताच अवैधपणे कोट्यवधींची माती वापरली जात असल्याचा प्रकार घडत आहे. त्याकडेही महसूल विभागाचे दुर्लक्ष असून, वीटभट्टीवरील विटांचे मोजमाप करून स्वामित्वधनाची वसुली करण्याची मागणी पुढे येत आहे.जिल्हय़ातील सर्वाधिक वीटभट्टय़ा अकोट उपविभागात सुरू आहेत. त्या वीटभट्टीधारकांकडून गौण खनिजाच्या महसुलाला चुना लावला जात आहे. हा प्रकार महसूल अधिकारी निमूटपणे सहन करीत आहेत. त्यातून शासनाचे दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान होत असल्याची बाब सातत्याने मांडण्यात आली आहे. छोट्या वीटभट्टीवर एका भट्टीतून ४0 हजार विटांची निर्मिती केली जाते. त्यासाठी ४0 ब्रास माती एका आठवड्यात लागते. महिन्याला १६0 ते २00 ब्रास माती या भट्टीवर लागते. नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात १२00 ते १४00 ब्रास मातीचा वापर त्या वीटभट्टी मालकाकडून केला जातो. प्रत्यक्षात स्वामित्वधन २00 ते ३00 ब्रासचे अदा केले जाते. त्यातून १000 ब्रास मातीचे स्वामित्वधन बुडवले जाते. मोठय़ा वीटभट्टी चालकांकडून ४00 ब्रास मातीचे स्वामित्वधन घेतले जाते. त्याआधारे चार ते पाच वीटभट्टय़ा चालवल्या जातात. आठवडाभरात एका भट्टीवर लाखापेक्षाही अधिक विटा तयार केल्या जातात. त्यासाठी मातीचा वापर अवैधपणे केला जातो. माती वाहतुकीची पास दोन ब्रासची असताना वाहनातून चार ब्रासची वाहतूक केली जाते. या सगळ्या प्रकारांकडे महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. त्यातून काहींचे हितसंबंधही गुंतले असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जाते. काहींनी मुद्दामपणे डोळेझाक सुरू केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याच्या तक्रारीही जिल्हाधिकार्‍यांकडे सातत्याने केल्या जात आहेत.