शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत्त मीटरच्या ऑनलाइन नोंदणीमुळे अनेकांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:38 IST

अलीकडेच सुरू झालेल्या विद्युत्त मीटरच्या ऑनलाइन  नोंदणी प्रक्रियेमुळे महावितरणच्या वीज कंपनी अधिकार्‍यांची  चांगलीच कोंडी झाली आहे. मॅन्युअल व्यवस्थेत कार्यालयात  असलेल्या वीज मीटरची नोंद नसल्याने आता अधिकार्‍यांना  जुळवाजुळव करावी लागत आहे. ज्या अधिकार्‍यांच्या ताब्यात  नवीन वीज मीटर आहेत, त्यांच्याकडून आता वरिष्ठांकडून मीटर  संख्येचा हिशेब घेतल्या जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण विभागाच्या नोंदीत २00 च्यावर मीटरप्रत्यक्षात मात्र बोंब

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अलीकडेच सुरू झालेल्या विद्युत्त मीटरच्या ऑनलाइन  नोंदणी प्रक्रियेमुळे महावितरणच्या वीज कंपनी अधिकार्‍यांची  चांगलीच कोंडी झाली आहे. मॅन्युअल व्यवस्थेत कार्यालयात  असलेल्या वीज मीटरची नोंद नसल्याने आता अधिकार्‍यांना  जुळवाजुळव करावी लागत आहे. ज्या अधिकार्‍यांच्या ताब्यात  नवीन वीज मीटर आहेत, त्यांच्याकडून आता वरिष्ठांकडून मीटर  संख्येचा हिशेब घेतल्या जात आहे.अतिरिक्त वीज बिलांच्या घोळामुळे अकोला जिल्हा सध्या  चांगलाच वादात सापडला असून, शहर आणि ग्रामीण विभागात  दररोजच्या तक्रारी येत आहेत. अँव्हरेज बिल, रिडिंगमधील घोळ  आणि इतर होत असलेल्या प्रकारामुळे अनेकजण घरातील विद्युत्त  उपकरण मोजणीसाठी अर्ज करतात; मात्र त्याकडे तीन-तीन महिने  दुर्लक्ष केले जाते. विद्युत्त उपकरणाची तपासणी केली असता,  अनेक मीटर फास्ट फिरत असल्याच्या बाबी समोर आल्यात. अँ क्युचेक करण्याचे अनेक अर्ज प्रलंबित असून, ग्रामीण उ पविभागात एकच यंत्र असल्याने कारणे दाखविली जातात. वीज  कंपनीचा दोष लक्षात आल्यानंतरही नवीन मीटर लावून देण्यास  टाळाटाळ केली जात आहे. याबाबत अधिक माहिती मिळविली  तेव्हा असे लक्षात आले, की ग्रामीण उपविभागाकडे नवीन वीज  मीटर नाही. वास्तविक पाहता ऑनलाइन वीज मीटरच्या नोंदीत  ग्रामीण उपविभागाकडे दोनशेच्यावर मीटर आहेत. येथे नवीन  मीटरची बोंबाबोंब आहे. मॅन्युअली हिशेब कुणाकडे नसल्याने आ ता या मीटरची जबाबदारी निश्‍चित करण्याचे प्रयोग सुरू आहेत.  दोनशेच्यावर आलेले नवीन मीटर ग्रामीण भागात लागले; मात्र  अनेक मीटरची नोंद झालेली नाही. त्यामुळे ग्राहकाला नवीन मीटर  लावून दिले जात नसून, त्यांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत  आहे. कंपनीने लावलेल्या अतिरिक्त वीज बिलांची रक्कम ता तडीने भरली नाही, तर त्यांना २१ टक्के व्याजही वेगळा लावला  जात असून, ग्राहक त्रासले आहेत. अशा स्थितीत अधिकारी  आणि कर्मचार्‍यांची चांगलीच कोंडी होत आहे.