शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील राष्ट्रीय स्मारकांची दुरवस्था

By admin | Updated: November 19, 2014 01:30 IST

पुरातत्व विभागाकडे कर्मचा-यांची कमतरता.

मयुर गोलेच्छा/लोणार (बुलडाणा)पुरातन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या विदर्भातील राष्ट्रीय संरक्षीत स्मारकांच्या देखभालीसाठी पुरातत्व खात्याच्या नागपूर विभागाकडे कर्मचारीच उपलब्ध नाहीत. परिणामी विदर्भातील राष्ट्रीय संरक्षीत स्मारके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.ऐतिहासिक आणि पौराणिक अधिष्ठाण लाभलेल्या लोणार शहरात ३३ पुरातन प्राचीन स्मारके आहेत. या स्मारकांचा उल्लेख युरोपीयन पुरातत्व संशोधकांनी लिहिलेल्या ह्यटेम्पल्स ईन बेरारह्ण आणि ह्यटेम्पल्स इन मेडीवलह्ण या पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे. शहरातील या ३३ पुरातन वास्तुंची देखभाल पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आली. त्यानुसार विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर जिल्हे पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. औरंगाबाद विभागाने बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या कारभाराकरीता लोणारला पुरातन विभागाच्या उपविभागीय कार्यालयाची १९९0 मध्ये स्थापना करण्यात आली. यात लोणार विभागाकरीता ९ कर्मचार्‍यांना मंजुरात मिळाली होती. त्यानंतर २00६ पासून ते मार्च २0१४ पर्यंंत शहरातील राष्ट्रीय संरक्षीत स्मारकांच्या सफाईसाठी, तसेच देखभालीसाठी ९ कर्मचारी रोजंदारीवर पद्धतीने कार्यरत होते. या काळात राष्ट्रीय संरक्षीत स्मारकांची आणि पुरातन मंदिरांची नियमीत स्वच्छता तसेच देखभाल होत असे. औरंगाबाद विभागात असताना विदर्भातील या ९३ स्मारकांची नियमीत देखभाल करणार्‍या १७0 मजुरांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याचे आदेश औरंगाबाद विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद विभागातील १४९ कर्मचार्‍यांना कायम करण्यात आले; मात्र याच काळात पूर्वी औरंगाबाद विभागात येणारे बुलडाणा, अकोला, अमरावती आणि चंद्रपूरसह नागपूर हे जिल्हे नागपूर विभागाशी जोडले गेले. त्यानंतर विदर्भातील लोणार आणि चंद्रपूर येथील २९ कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी न करता त्यांना कामावरुन कमी करण्यात आले. त्यामुळे गेल्या ७ महिन्यापासून विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती व चंद्रपुरातील ९३ राष्ट्रीय संरक्षीत स्मारकांपैकी काही स्मारके देखभालीअभावी नष्ट होत आहेत. पुरातत्व विभागाच्या नागपूर मंडळाचे अधिक्षक टी जे अलोणे यांनी लोणार येथे पुरातत्व विभागामार्फत राष्ट्रीय संरक्षीत स्मारकाच्या देखभालीसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गरज असेल तेव्हा पुन्हा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगीतले.